शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

अर्थसंकल्प गरिबांच्या बाजूचा नव्हे तर राजकीय

By admin | Published: March 01, 2016 3:46 AM

‘नरेंद्र मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प ‘राजकीय’ असून, त्यात शेतमालाच्या किमती या महत्त्वाच्या विषयावर काहीच भाष्य नसल्यामुळे तो शेतकऱ्यांना आपला वाटणार नाही

‘नरेंद्र मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प ‘राजकीय’ असून, त्यात शेतमालाच्या किमती या महत्त्वाच्या विषयावर काहीच भाष्य नसल्यामुळे तो शेतकऱ्यांना आपला वाटणार नाही,’ अशा शब्दांत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी टीका केली. शेतमालासाठी महत्त्वाचा असतो तो त्याला मिळणारा लाभ. गेल्या वर्षीही शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. किमतीतील संकेतामुळे शेतकऱ्यांना हुरूप येतो. शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर परतावा मिळत नाही, असे ते म्हणाले. कोणत्याही अंगाने हा अर्थसंकल्प गरीबांच्या बाजूने नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हा अर्थसंकल्प म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) धोरणांचा विस्तार आहे, असे ते म्हणाले.महत्त्वाच्या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी कोणताही महत्त्वाचा पुढाकार यात नाही.यूपीएच्या योजनाच पुढे चालू ठेवल्याचा मला आनंद वाटतोय.ग्रामीण आणि सामाजिक कार्यक्रमांकडे या सरकारने गेल्या दोन वर्षांत पाठ फिरविली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था, खासगी गुंतवणूक आणि निर्यात हे तीन विषय आमच्याकडे लक्ष द्या, म्हणून टाहो फोडताहेत.वीज, पोलाद, खाण, सिमेंट, तेल आणि वायू या महत्त्वाच्या क्षेत्रांच्या प्रश्नांची या सरकारला जाणच नाही. अनेक महत्त्वाचे प्रकल्प निराधार झाले असून, नव्याने फारच थोडी गुंतवणूक झाली आहे.निर्यातीचा कुठे उल्लेखच नाही. सलग १४ महिन्यांच्या नकारात्मक वाढीनंतर सरकारने निर्यातीच्या आघाडीवर प्रयत्न करणे सोडून दिल्याचे दिसते.विरोधकांच्या न्याय्य अशा टीकेचा सन्मान राखला जाईल, असे आश्वासन नाही. सरकार हट्ट सोडायला तयार नाही.