शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

"नऊ लाख पदे रिक्त, किती जणांना दिल्या नोकऱ्या?", बेरोजगारीवरून काँग्रेसने मोदी सरकारला घेरले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 3:40 PM

Budget Session 2022 : 2014 च्या निवडणुकीत तुम्ही दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? असा सवाल करत आता येत्या पाच वर्षांत 60 लाख नवीन नोकऱ्यांचे आश्वासन देत आहोत, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला कोंडीत पकडले. काँग्रेसचे राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी अर्थसंकल्पात पुढील पाच वर्षांत 60 लाख नव्या नोकऱ्या देण्याच्या घोषणेवरून केंद्र सरकारला धारेवर धरले. 

2014 च्या निवडणुकीत तुम्ही दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? असा सवाल करत आता येत्या पाच वर्षांत 60 लाख नवीन नोकऱ्यांचे आश्वासन देत आहोत, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी टीका केली. 

देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. मोठे कारखाने बंद पडत आहेत, नवीन गुंतवणूक येत नाही आणि सरकारी नोकऱ्या कमी होत असल्याने तरुण अडचणीत आले आहेत, असे ते म्हणाले. याचबरोबर, मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारला विचारले की, 2014 मध्ये तुम्ही दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. त्याआधारे तुम्ही आतापर्यंत 15कोटी नोकऱ्या द्यायला हव्या होत्या. पण प्रत्यक्षात तुम्ही किती नोकऱ्या दिल्या? असा सवाल मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

'9 लाख पदे रिक्त असून 60 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन'यंदाच्या अर्थसंकल्पात तुम्ही पुढील पाच वर्षांत केवळ 60 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे, असे विधान मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. तर केंद्र सरकारमध्ये नऊ लाख पदे रिक्त आहेत. अधिकृत आकडेवारी देताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हणाले की, रेल्वेमध्ये 15 टक्के, संरक्षण क्षेत्रातील 40 टक्के आणि गृहखात्याशी संबंधित 12 टक्के पदे रिक्त आहेत, मग ती का भरली जात नाहीत? आज शहरी भागात बेरोजगारीचा दर नऊ टक्क्यांवर तर ग्रामीण भागात 7.2 टक्क्यांवर गेला आहे, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022jobनोकरीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी