शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

बैलगाडी शर्यतीवर बंदी कायम - सर्वोच्च न्यायालय

By admin | Published: January 12, 2016 1:44 PM

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींरील बंदी कायम ठेवली आहे. मागच्या आठवडयात केंद्र सरकारने बैलगाडीच्या शर्यतीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला होता.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १२ - सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूतील जलिकट्टू व महाराष्ट्रातल्या बैलगाडी शर्यतींवरील बंदी कायम ठेवली आहे. मागच्या आठवडयात केंद्र सरकारने खेळ, मनोरंजन, खेळांसाठी प्रशिक्षण करण्यास मनाई असलेल्या यादीमधून बैलाचे नाव वगळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तामिळनाडूमध्ये जलिकट्टू व महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अतिशय लोकप्रिय असलेल्या बैलगाडीच्या शर्यतीचा मार्ग मोकळा झाला होता. या निर्णयाला प्राणी मित्र संघटना पेटा आणि बंगळुरुतील एका अशासकीय संस्थेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तामिऴनाडूत जलिकट्टूला परवानही मिळावी यासाठी राजकीयदृष्ट्या प्रेरीत होऊन हा निर्णय सरकारने घेतल्याची टीका होत होती. सर्वोच्च न्यायालयाने तामिऴनाडू, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला यासंबंधी सविस्तर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. 
परवानगी देताना केंद्र सरकारने काही अटी घातल्या होत्या.या शर्यती आखून दिलेल्या मार्गावरच घेण्यात याव्यात, तसेच त्यांची लांबी २ किलोमीटरपेक्षा जास्त नसावी. शर्यतीपूर्वी बैलांची पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांकडून तपासणी करून घेण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले होते.
या शर्यतींदरम्यान बैलांनी जोरात धावावे यासाठी, त्यांना उत्तेजन देण्यासाठी त्यांचे हाल केले जातात, असे सांगत प्राणीमित्र संघटनांनी या शर्यतींना विरोध केला होता. त्या आधारावर पूर्वी काँग्रेस सरकारने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती.
दरम्यान, तामिळनाडूमध्ये गावागावातून सुप्रीम कोर्टाच्या या स्थगितीला विरोध होतील अशी चिन्हे आहेत. पोंगल हा तामिळनाडूतला मुख्य उत्सव, ज्यावेळी जलिकट्टू हा खेळ खेळला जातो तो चार दिवसांवर आला आहे. त्यामुळे आता हा खेळ खेळता येईल की नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. जर जलिकट्टू नाही तर मत नाही अशी भूमिका घेत, काही गावातील लोकांनी रेशन कार्ड व व्होटिंग कार्ड परत करण्याचा इशारा दिला आहे.