शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
4
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
5
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
6
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
7
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
8
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
9
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
10
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
11
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
12
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
13
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
14
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
15
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
16
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
17
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
18
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
19
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
20
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!

इमारत कोसळली, तीस तास कुटुंब अडकले; तीन टोमॅटो खाऊन जीवंत राहिले; पीडितांनी आपबीती सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:35 IST

Burari Building Collapsed : दोन दिवसापूर्वी दिल्लीतील मुरारी येथे एक इमारत पडून मोठी दुर्घटना घडली. या इमारती खाली एक कुटुंब अडकले होते.

Burari Building Collapsed ( Marathi News ) : दोन दिवसापूर्वी दिल्लीतील मुरारी येथे एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली होती. या इमारतीचा पडलेला ढिगारा काढण्याचे काम सुरू होते, आज या ढिगाऱ्याखाली एक कुटुंब अडकल्याचे दिसले. या सर्वांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. दैव बलवत्तर! म्हणून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, या कुटुंबातील सर्वच सदस्यांची तब्येत चांगली आहे. फक्त जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Varanasi Boat Accident: मोठी घटना! वाराणसीमध्ये ६० प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, शोधमोहिम सुरू

दिल्लीतील बुरारी येथे या आठवड्याच्या सुरुवातीला कोसळलेल्या पाच मजली इमारतीच्या ढिगाऱ्यातून पोलिसांनी चार जणांच्या कुटुंबाला जिवंत बाहेर काढले. राजेश (३०), त्याची पत्नी गंगोत्री (२६) आणि त्यांची मुले प्रिन्स (६) आणि हृतिक (३) अशी या पुरूषांची ओळख पटली आहे. याबाबत कुटुंब प्रमुखांनी आपबीती सांगितली. कुटुंबप्रमुखांनी सांगितले की, ते किमान ३० तास ढिगाऱ्यात अडकले होते आणि फक्त ३ टोमॅटो खाल्ल्याने ते वाचले. त्यांना बाहेर काढण्यात आले तेव्हा संपूर्ण कुटुंब बेशुद्ध होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टोमॅटो सापडले तेच खाऊन दिवस काढला 

२९ जानेवारी रोजी रात्री उशिरा केलेल्या बचाव कार्यात संपूर्ण कुटुंबाला इमारतीच्या ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने घरात राहिलेले ३ टोमॅटो खाऊन त्यांची भूक भागवली, असंही कुटुंबीय म्हणाले.

त्यांच्या कुटुंबीयांची एएनआयने मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेची आपबीती सांगितली. राजेश म्हणाले की, सायंकाळी ६.३० च्या सुमारास ते त्यांच्या कुटुंबासाठी जेवण बनवण्यासाठी जात असताना इमारत कोसळली. त्यांनी ढिगारा काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण यात अयशस्वी झालो. घरात उरलेले फक्त ३ टोमॅटो खाऊन आमचे संपूर्ण कुटुंब ३० तासांहून अधिक काळ जीवंत राहिले.

त्यांनी लगेच हार मानली होती आणि आता जे काय होईल ते देवच करेल, असं त्यांनी सांगितले. राजेश यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले तेव्हा ते सर्व बेशुद्ध होते. ते कधी आणि कसे रुग्णालयात पोहोचले हे आम्हालाही माहित नाही.

ढिगाऱ्याखालून १६ जणांना बाहेर काढले

इमारतीच्या छताचा स्लॅब कोसळल्याने कुटुंब ढिगाऱ्यात अडकले होते. पण हा स्लॅब एलपीजी सिलेंडरवर पडला, त्यामुळे राजेश आणि त्याचे कुटुंब ढिगाऱ्याखाली दबण्यापासून वाचले. इमारत कोसळल्यापासून १६ जणांना वाचवण्यात आले आहे. या घटनेत २ अल्पवयीन मुलांसह ५ जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :delhiदिल्लीAccidentअपघात