शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

'...पण मी असे होऊ देणार नाही'; भाजप नेत्याच्या विधानावर ममता बॅनर्जी भडकल्या, मुद्दा काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 11:32 IST

Ram navami political news: विधानसभा निवडणुकीमुळे पश्चिम बंगालमध्ये आतापासूनच वातावरण तापू लागले आहे. त्यात भाजप नेत्याने केलेल्या एका विधानावरून ममता बॅनर्जींनी टीका केली.

Mamata Banerjee vs Suvendu Adhikari:पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसविरोधात भाजप जोरात तयारीला लागली आहे. त्यात आता राम नवमीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदुत्ववादी संघटना ६ एप्रिल रोजी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शोभायात्रा काढणार आहे असून, भाजपने त्याला पाठिंबा दिला आहे. अशात भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केलेल्या एका विधानावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच संतापल्या आणि हे दंगली करायला आले आहेत, असे म्हणाल्या. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भाजपचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, "यावर्षी राम नवमीच्या दिवशी कमीत कमी १ कोटी हिंदू पश्चिम बंगालमधील रस्त्यावर उतरतील. २००० शोभायात्रा काढल्या जातील. यात्रा काढण्यासाठी प्रशासनाची कोणतीही परवानगी घेऊ नका. रामाची पूजा करण्यासाठी आम्हाला प्रशासनाच्या परवानगीची गरज नाही. आम्ही शांत राहू, पण प्रशासनाने हे निश्चित करावं की दुसरे लोकही शांततेत राहतील."

हेही वाचा >>रमजान ईदच्या दिवशी बड्या उद्योगपतीच्या हत्येचा कट; अंधेरीत सापडले बिश्नोई गँगचे शूटर्स

भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केलेल्या याच विधानावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला. हे दंगल करण्यासाठी आली आहेत, असे म्हणत ममता बॅनर्जींनी अधिकारी यांच्यावर टीका केली. 

ममता बॅनर्जींची सुवेंदू अधिकारींच्या टीकेवर भूमिका काय?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी सुद्धा हिंदू आहे. मुसलमान पण आहे, शीख आहे आणि ख्रिश्चन सुद्धा आहे. पण, त्या सगळ्यात आधी मी एक भारतीय आहे. विरोधी पक्षाचे राजकारण फक्त लोकांमध्ये फूट पाडण्याचे आहे. मी असे होऊ देणार नाही. काही लोक राज्यात दंगली घडवण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या चिथावणीला बळू पडू नका", अशी भूमिका ममता बॅनर्जींनी मांडली. 

पश्चिम बंगालमध्ये २०२४ मध्ये घडली होती हिंसक घटना

पश्चिम बंगालमध्ये २०२४ मध्ये राम नवमीच्या दिवशी हिंसक घटना घडल्या होत्या. १७ एप्रिल २०२४ रोजी मुर्शिदाबादमधील शक्तिपूरमध्ये राम नवमी निमित्त काढलेल्या शोभायात्रेदरम्यान हिंसा झाली होती. 

काही लोकांनी छतावरून दगड आणि बॉम्ब फेकल्याचा आरोप केला गेला होता. यात २ मुले आणि पोलिसांसह १८ लोक जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास आधी पोलिसांनी केला. त्यानंतर ते प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आणि नंतर तपास एआयएकडे सोपवण्यात आला होता. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाRam Navamiराम नवमीtmcठाणे महापालिका