शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

जमीन विकत किंवा भाडेपट्ट्याने घ्या!

By admin | Published: September 13, 2015 2:06 AM

विविध विकास कामे आणि उद्योगधंद्यांसाठी सरकारने नागरिकांची जमीन कायद्याने संपादित करण्याऐवजी ती रीतसर खरेदी करावी किंवा दीर्घमुदतीने भाडेपट्ट्यावर घ्यावी,

नवी दिल्ली : विविध विकास कामे आणि उद्योगधंद्यांसाठी सरकारने नागरिकांची जमीन कायद्याने संपादित करण्याऐवजी ती रीतसर खरेदी करावी किंवा दीर्घमुदतीने भाडेपट्ट्यावर घ्यावी, असे मत निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी व्यक्त केले आहे.गेल्या वर्षभरात तीन वेळा वटहुकूम काढून लागू ठेवलेल्या सुधारित भूसंपादन कायद्याचा हट्ट मोदी सरकारने सोडून दिल्यानंतर डॉ. पनगढिया यांनी आता मुळात केंद्र सरकारने भूसंपादन कायदा करण्याची गरजही नाही, असे सूतोवाच करून त्याऐवजी हवी असलेली जमीन मिळविण्याचे काही पर्याय सूचविले आहेत. डॉ. पनगढिया म्हणतात की, लोकशाही समाजामध्ये कोणत्याही प्रकारच्या सक्तीला विरोध करणे ही नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे. भूसंपादनाच्या संदर्भात याचा अर्थ होतो जमीनमालकाच्या संमतीशिवाय सरकारने त्याची जमीन सक्तीने घेणे. पण खरेदीदार आणि विक्रेता या उभयतांच्या संमतीनेच व्यवहार करायचा असेल तर मुळात ज्यात सक्ती हा अर्थ अभिप्रेत आहे असा भूसंपादन हा शब्द वापरण्याचीही गरज नाही. डॉ. पनगढिया म्हणतात की, असे असले तरी व्यापक जनहित साध्य करण्यासाठी प्रसंगी मालकाच्या संमतीशिवाय त्याची जमीन घेण्याचा अधिकार सरकारला असायला हवा. मात्र पूर्वेतिहास पाहता हा अधिकार कशा स्वरूपात वापरायचा याविषयी काही नवा विचार अनुसरण्याची गरज आहे. (विशेष प्रतिनिधी)पनगढियांचे तीन पर्यायजमीनमालकाच्या संमतीने त्याची जमीन संपादित करण्याऐवजी ती रीतसर खरेदी करावी.‘लॅण्ड पूलिंग’ही जमीनमालकांना अधिक स्वीकारार्ह ठरेल. यात एखाद्या प्रकल्पासाठी जेवढी जमीन हवी असेल त्याहून जास्त जमीन संपादित करायची व प्रकल्प पूर्ण झाल्यावर जास्तीची जमीन मूळ जमीनमालकांना वाटून द्यायची. याचा फायदा असा की, प्रकल्पामुळे त्या जमिनीची किंमत वाढते. ही वाढलेली किंमत प्रकल्पाआधीच्या संपूर्ण जमिनीहून जास्त असल्याने जमीनमालकांना अधिक मोबदला मिळू शकेल.जमीन खरेदी किंवा संपादित करण्याऐवजी दीर्घकालीन भाडेपट्टयाने घ्यायची. हा पर्यायही जमीनमालकांच्या दृष्टीने आकर्षक आहे. कारण जमिनीची मालकी त्यांच्याकडेच राहील, त्यांना भाडेपट्ट्यातून नियमित उत्पन्न मिळत राहील व भाडेपट्याची मुदत संपल्यावर पुन्हा नव्या अटी व शर्ती वाटाघाटीने ठरविण्याचे स्वातंत्र्य त्यास मिळेल.