शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

कॉल ड्रॉपसाठीची भरपाई रद्द : १०० कोटी ग्राहकांना कोर्टाचा दणका

By admin | Published: May 12, 2016 4:41 AM

ग्राहकास भरपाई देण्यासंबंधीचा ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’ने (ट्राय) केलेला नियम सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केल्याने मोबाइल कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला.

नवी दिल्ली : मोबाइल फोनवरून केलेला फोन लागल्यानंतर तो मध्येच ‘ड्रॉप’ झाल्यास ग्राहकास भरपाई देण्यासंबंधीचा ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’ने (ट्राय) केलेला नियम सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केल्याने मोबाइल कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला.प्रत्येक ‘ड्रॉप कॉल’साठी एक रुपया व दिवसाला प्रत्येक ग्राहकास कमाल तीन रुपये या दराने भरपाई देण्याची सक्ती करणारा नियम ‘ट्राय’ने यंदाच्या १ जानेवारीपासून लागू केला होता. ‘ट्राय’चा हा नियम ‘अवाजवी, मनमानी आणि अपारदर्शी’ ठरवून सर्वोच्च न्यायालयाने तो रद्द केला. परिणामी, देशभरातील सुमारे १०० कोटी मोबाइल ग्राहकांना मध्येच ‘ड्रॉप’ होणाऱ्या कॉलबद्दल तुटपुंजी का होईना, पण भरपाई मिळण्याचा मार्ग बंद झाला.‘सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडिया’ (सीओएआय) ही मोबाईल कंपन्यांची संघटना आणि २१ मोबाईल कंपन्यांनी ‘ट्राय’च्या या नियमास आधी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु तेथे याचिका फेटाळल्या गेल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपिले केली होती. न्या. कुरियन जोसेफ व न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठाने ही अपिले मंजूर करून ‘ट्राय’या नियम रद्द केला. ‘ट्राय’ने असा नियम करण्याऐवजी केंद्र सरकारने ‘कॉल ड्रॉप’च्या संदर्भात अमेरिकेच्या धर्तीवर कायदा करावा, असेही न्यायालयाने सुचविले.आम्ही आमची यंत्रणा व तंत्रज्ञान सुधारण्यासाठी मोठी गुंतवणूक केली तरी आमच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या अनेक कारणांमुळे ग्राहकाने लावलेला प्रत्येक कॉल पूर्ण करणे प्रत्येक वेळी शक्य होतेच असे नाही. खास करून विविध नागरी संघटना व स्थानिक नगरपालिकांच्या आक्षेप/ विरोधामुळे पुरेशा संख्येने मोबाईल टॉवर उभारणे शक्य होत नाही. हे ‘कॉल ड्रॉप’चे एक प्रमुख कारण आहे, असे मोबाईल कंपन्यांचे म्हणणे होते. ‘कॉल ड्रॉप’ पूर्णपणे रोखणे आमच्या आवाक्याबाहेरचे असूनही त्यासाठी भरपाई द्यायला लावली तर आमच्यावर वर्षाला ५४ हजार कोटी रुपयांचा नाहक बोजा पडेल, असा मोबाईल कंपन्यांचा दावा होता.अपिलांवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने या निर्णयाचा फेरविचार करणे शक्य आहे का, असे विचारले असता ‘ट्राय’ने असे सुचविले होते की, मोबाईल कंपन्या प्रत्येक ‘ड्रॉप कॉल’साठी कोणत्याही पूर्वअटीशिवाय ग्राहकास एक ‘फ्री कॉल’ देण्यास तयार असतील, तर रोख स्वरूपात भरपाई देण्याचा आदेश मागे घेतला जाऊ शकेल. परंतु कंपन्यांनी हा प्रस्ताव मान्य केला नव्हता.(लोकमत न्यूज नेटवर्क)