शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

"कामचलावू मुख्यमंत्री म्हणणे, हा माझाही अपमान"; केजरीवालांच्या विधानावर उप राज्यपालांचा संताप, आतिशींना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 22:39 IST

Vinay Kumar Saxena Atishi Arvind Kejriwal: मुख्यमंत्री आतिशी यांचा उल्लेख अरविंद केजरीवाल यांनी 'कामचलावू मुख्यमंत्री' असा केल्याने उप राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी संताप व्यक्त केला.

Delhi LG Atishi: अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री आतिशी यांचा उल्लेख कामचलावू मुख्यमंत्री केल्याच्या मुद्द्यावर दिल्लीचे उप राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी संताप व्यक्त केला. तुमचा असा उल्लेख करणे हा फक्त तुमचाच नाही, तर राष्ट्रपती आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझाही अपमान आहे, असे उप राज्यपालांनी म्हटले आहे. उप राज्यपालांना मुख्यमंत्री आतिशी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. 

उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी पत्रात म्हटले आहे की, "काही दिवसांपूर्वी तुमचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना तुम्हाला तात्पुरत्या आणि कामचलावून मुख्यमंत्री म्हटले. हे मला आक्षेपार्ह वाटले. हा केवळ तुमचा अपमान नाहीये, तर आपली नियुक्ती करणाऱ्या भारताच्या राष्ट्रपती आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझाही अपमान आहे."

"तात्पुरत्या किंवा कामचलावू मुख्यमंत्री म्हणून जी व्याख्या केजरीवाल यांनी केली आहे, त्याबद्दल संविधानात कोणतीही तरतूद नाहीये आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातील लोकशाही भावनेचा आणि मूल्यांचा अवहेलना आहे", अशी टीका उप राज्यपालांनी केली आहे. 

"मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळाची गरिमा डागाळत आहे"   

उप राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे की, "ज्या प्रकारे केजरीवाल यांच्याकडून तुमच्या उपस्थितीत अनाधिकृतपणे वरिष्ठ नागरिक आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाने महिलांशी संबंधित योजना हवेत घोषणा केल्या जात आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री पद आणि मंत्रिमंडळाची गरिमा डागाळत आहे", असेही त्यांनी म्हटले आहे. 

उप राज्यपाल घाणेरडे राजकारण करताहेत -मुख्यमंत्री आतिशी

उप राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या पत्रावर मुख्यमंत्री आतिशी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. "तुम्ही घाणेरडे राजकारण करण्याऐवजी दिल्लीच्या विकासावर लक्ष द्या. अरविंद केजरीवालांनी साडे नऊ वर्ष दिल्लीच्या भल्यासाठी काम केले. मी अरविंद केजरीवाल यांनी दाखवलेल्या मार्गानेच सरकार चालवत आहेत. दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवालांना वार वार जिंकून दिले आहे. महिला सन्मान योजनेत तुम्ही आडकाठी आणल्याबद्दल मी तुमच्याबद्दल वैयक्तिक दुखी आहे", असे मुख्यमंत्री आतिशींनी म्हटले आहे.

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAtishiआतिशीdelhi electionदिल्ली निवडणूक