शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील 'या' ३ जागा वगळता ३३ जागांवर एकमत; तिढा सोडवण्यासाठी मविआ नेत्यांची बैठक
2
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर 
3
राज्य सरकारकडून २७ महामंडळांवर नियुक्त्या: भाजपच्या वासुदेव काळेंनाही निष्ठेचं फळ; कॅबिनेट मंत्रि‍पदाचा दर्जा!
4
IND vs NZ: ४६ धावांत All Out! Team India च्या नावे झाले हे ५ लाजिरवाणे विक्रम
5
“जयंत पाटील अन्य कुठे जाऊ नये म्हणून शरद पवार तसे म्हणाले असतील”; शिंदे गटातील नेत्याची टीका
6
नायब सिंह सैनी यांनी घेतली हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; कोण-कोण आमदार बनले मंत्री? पाहा संपूर्ण यादी...
7
Baba Siddique : "गोळ्या लागल्या आहेत, मला वाटत नाही की, मी..."; बाबा सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द
8
आदिती तटकरेंचं फेसबुक अकाऊंट हॅक; व्यक्त न होण्याचं केलं आवाहन
9
नाशिकच्या भाजपा आमदाराची निवडणुकीतून माघार; कौटुंबिक कलह टाळण्यासाठी घेतला निर्णय
10
IND vs NZ : चूक कोणाची? ताळमेळ नसल्यानं सोपा झेल सुटला; पाकिस्तानसारखी फजिती, रोहित संतापला
11
१७ वर्षांपासून साथ, पण विधानसभेच्या तोंडावर सहकाऱ्याने फिरवली पाठ; रवी राणांना मोठा धक्का!
12
सपाचा महाराष्ट्रातील 10-12 जागांवर डोळा; जागा वाटपाबाबत अखिलेश यादव स्पष्ट बोलले...
13
Vastu Tips: ताटात एकाचवेळी तीन पोळ्या वाढू नका; वास्तू दोष निर्माण करणाऱ्या चुका टाळा!
14
Kumbh mela 2025: येत्या काळात प्रयागराज येथे भरणार महाकुंभमेळा; पण कधी? ते जाणून घ्या!
15
मुलगा सांगून मुलगी हातात दिली, बाळाच्या कुटुंबीयांचा संताप; अदलाबदलीबाबत संशयकल्लोळ
16
Nikhil Kamath यांनी खरेदी केलं घर; पूर्वी रेंटवर राहण्याला म्हणायचे फायद्याचं, 'या'मुळे बदलला निर्णय
17
प्रवाशांनो लक्ष द्या! ट्रेनमध्ये सामान चोरीला गेले तर रेल्वेची जबाबदारी; प्रवाशाची बॅग झाली होती चोरी, आता मिळणार ४.७ लाख रुपये
18
PAK vs ENG : पाकिस्तानचा 'गब्बर'! एकट्यानं इंग्लंडला लोळवलं; सात बळी अन् धवनसारखे सेलिब्रेशन
19
शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार, विरोधात अटक वॉरंट जारी; कोर्टाने १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश
20
अरे देवा! कार चालवताना हेल्मेट घातलं नाही म्हणून १००० रुपयांचा दंड; ट्रॅफिक पोलिसांचा कारनामा

दलित मुस्लिम, दलित ख्रिश्चनांच्या अहवालावर विश्वास ठेवू शकतो का? सर्वोच्च न्यायालयाची विचारणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 7:23 AM

नवी दिल्ली : सरकारने फेटाळलेल्या किंवा न स्वीकारलेल्या चौकशी आयोगाच्या अहवालाचा काय परिणाम होतो आणि अहवालाचा आधार असलेल्या इंपेरिकल ...

नवी दिल्ली :

सरकारने फेटाळलेल्या किंवा न स्वीकारलेल्या चौकशी आयोगाच्या अहवालाचा काय परिणाम होतो आणि अहवालाचा आधार असलेल्या इंपेरिकल डेटाचा घटनात्मक मुद्दा ठरवताना विचार केला जाऊ शकतो का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केला. 

दलित मुस्लिम आणि दलित ख्रिश्चनांच्या कोट्याचा प्रश्न विचारात घेताना न्यायालयाने रंगनाथ मिश्रा आयोगाच्या अहवालाचा संदर्भ दिला, ज्यात दलित मुस्लिम आणि दलित ख्रिश्चनांचा अनुसूचित जातींच्या यादीत समावेश करण्याची शिफारस केली होती. हा अहवाल सदोष असल्याचे सांगत सरकारने तो स्वीकारलेला नाही.

संविधान (अनुसूचित जाती) आदेश, १९५० हा भेदभाव करणारा आहे आणि कलम १४ (कायद्यासमोरील समानता) आणि १५ चे (धर्म, वंश, जात इ.च्या आधारावर भेदभाव करण्यास प्रतिबंध) उल्लंघन करतो. संविधान म्हणून हिंदू, शीख आणि बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मात धर्मांतर करणाऱ्या अनुसूचित जातींमध्ये भेदभाव करतो, असा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करत होते. 

संविधान (अनुसूचित जाती) आदेश, १९५० (वेळोवेळी सुधारित) नुसार म्हणतो की, हिंदू, शीख आणि बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्माचा दावा करणारी कोणतीही व्यक्ती अनुसूचित जातीचा सदस्य असल्याचे मानले जाणार नाही.

याचिकाकर्त्यांपैकी एकाचे वकील प्रशांत भूषण यांनी न्यायमूर्ती एस. के. कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले की, दलित ख्रिश्चन आणि दलित मुस्लिमांचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याची शिफारस करणारा २००७ चा न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोगाचा अहवाल सरकारने स्वीकारलेला नाही. सूची व भारताचे माजी मुख्य न्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन आयोग स्थापन केला आहे. आता, ते (सरकार) म्हणत आहेत की त्यांनी दुसरा आयोग नेमला आहे. पुरेशी सामग्री आहे ज्याच्या आधारे न्यायालय पुढे जाऊ शकते. सरकारने आयोग नेमण्यासाठी या न्यायालयाने वाट पहावी का?

अतिरिक्त महाधिवक्ता के. एम. नटराज केंद्रातर्फे म्हणाले की न्यायमूर्ती बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील आयोग आपले काम करत आहे आणि संबंधित सामग्री आणि डेटा गोळा केला जाणार आहे.‘न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग होता. त्याचा अहवाल तुम्ही तुमच्या समजदारीवर स्वीकारलेला नाही. तुम्ही दुसरा आयोग स्थापन केला. आयोगाच्या उत्तराची वाट पहावी का?” असे खंडपीठाने विचारले. या प्रकरणात ११ जुलैला पुन्हा सुनावणी ठेवली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय