शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

‘देशद्रोहाचा कायदा’ रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2016 12:05 AM

देशद्रोहाच्या आरोपाची व्याख्या अतिशय विस्तृत असून विधि आयोगाकडून त्याची समीक्षा केली जात असल्याचे सरकारने बुधवारी सांगितले. देशद्रोहासंबंधी कायदा वसाहत

नवी दिल्ली : देशद्रोहाच्या आरोपाची व्याख्या अतिशय विस्तृत असून विधि आयोगाकडून त्याची समीक्षा केली जात असल्याचे सरकारने बुधवारी सांगितले. देशद्रोहासंबंधी कायदा वसाहत काळाचे अवशेष म्हणून उरला आहे, तो रद्द करा, अशी जोरदार मागणी विरोधकांनी राज्यसभेत केली.दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वाद संपूर्ण देशभर गाजल्यानंतर देशद्रोहासंबंधी कायदा खऱ्या अर्थाने प्रकाशात आला. विरोधकांची मागणी पाहता विधि आयोगाने या कायद्यासंबंधी अहवाल सादर केल्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी संमती दर्शविली आहे. विधि आयोग या कायद्याचा आढावा घेत असून, आयोगाला लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केवळ जेएनयू वादाचा अपवाद वगळता बहुतांश प्रकरणे दिल्लीबाहेर नोंदण्यात आली असल्यामुळे या कायद्याचा स्वैर वापर केला जात असल्याचा विरोधकांनी केलेला आरोप सरकारने फेटाळून लावला.सरकारविरुद्ध बोलणाऱ्या कुणाहीविरुद्ध देशद्रोहाच्या कायद्याचा वापर केला जाऊ शकतो. तथापि, या कायद्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे त्यात सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. अशी विविध प्रकरणे उपस्थित केली जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या कायद्याचा सर्वंकष आढावा घ्यावा, असे विधि आयोगाला मी सुचवेन, असे गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी एका उत्तरात स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)देशात सरकारविरुद्ध बोलल्यास निम्मे पक्ष देशविरोधी ठरतील. जातीय आधारावरील विभागणी देशद्रोहाच्या कायद्याखाली का आणली जात नाही?-गुलाम नबी आझाद, राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेवसाहत काळातील वारसा ठरणाऱ्या या कायद्यापासून मुक्तता हवी. देशद्रोहाचा कायदा रद्द केला जावा.-शरद यादव, जेडीयू