शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

निकाल रद्द की, यादीत दुरुस्ती तलाठी भरती : प्रशासनाचे चाचपडणे सुरूच

By admin | Published: April 15, 2016 1:55 AM

नाशिक : तलाठी भरतीत उमेदवारांची निवड करताना झालेल्या गैरप्रकाराचे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच, चाचपडणार्‍या प्रशासनाने उलट-सुलट निर्णय घेऊन हजारो उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. जाहीर केलेली निवड यादी अंतिम नाही असे एकीकडे सांगत असतानाच तलाठी भरतीची निवड यादी रद्द केल्याचे जाहीर करणार्‍या प्रशासनाने दुसरीकडे अन्याय झालेल्या उमेदवारांकडून लेखी तक्रारीही मागितल्या आहेत. त्यामुळे प्रशासन नेमके काय करणार याविषयी स्पष्ट उलगडा होत नाही.

नाशिक : तलाठी भरतीत उमेदवारांची निवड करताना झालेल्या गैरप्रकाराचे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच, चाचपडणार्‍या प्रशासनाने उलट-सुलट निर्णय घेऊन हजारो उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. जाहीर केलेली निवड यादी अंतिम नाही असे एकीकडे सांगत असतानाच तलाठी भरतीची निवड यादी रद्द केल्याचे जाहीर करणार्‍या प्रशासनाने दुसरीकडे अन्याय झालेल्या उमेदवारांकडून लेखी तक्रारीही मागितल्या आहेत. त्यामुळे प्रशासन नेमके काय करणार याविषयी स्पष्ट उलगडा होत नाही. लिपिक व तलाठी भरतीचे निकाल जाहीर झाल्यानंतर उघड झालेल्या बाबींमुळे अडचणीत आलेल्या प्रशासनाने आता कालापरत्वे भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. जाहीर झालेली निवड यादी अंतिम नाही, त्यात फेरबदल होऊ शकतो असे एकीकडे सांगतानाच, संपूर्ण निवड यादीच रद्द करून २१ एप्रिलनंतर नव्याने यादी जाहीर करण्याचा मनोदयही प्रशासनाने बोलून दाखविला आहे. या निवड यादी विषयी प्रामुख्याने कमी गुण मिळालेल्यांना थेट नियुक्ती देतानाच, परीक्षेला अनुत्तीर्ण असलेल्यांची वर्णी प्रतीक्षा यादीत लावण्याचा प्रकार घडला आहे. एवढेच नव्हे तर पेसा क्षेत्राची बाबही उमेदवारांपासून दडवून ठेवून, हजारो विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळण्यात आले आहे. गुणवत्ता प्राप्त करूनही हजारो उमेदवारांची निवड यादीत वर्णी लागू शकलेली नाही. त्यामुळे पेसा क्षेत्रातील उमेदवारांबाबत प्रशासन काय निर्णय घेणार हेदेखील गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे निवड यादीविषयी तक्रारी घेऊन गेलेल्या उमेदवारांना लेखी तक्रारी करा म्हणून सल्ला देण्यात येत असून, त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणार म्हणजे काय याविषयीही कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे परीक्षा शुल्क भरून परीक्षेसाठी दिवसरात्र मेहनत घेणार्‍या व गुणवत्ता मिळालेल्या उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. निवड यादी रद्द केली तर त्यासाठ पात्र ठरलेले उमेदवार त्याविरुद्ध न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यातही ज्यांची निवड झाली आहे व गुणवत्ता पात्र असूनही ज्यांना डावलण्यात आले, त्यांना फेर यादीत सामावून घेण्याचा प्रकार म्हणजे निवडीतील गैरप्रकाराची कबुली दिल्यासारखेच होणार आहे. प्रशासन या सार्‍या प्रकारात चाचपडत असल्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.