शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

निवडणुकीत कायद्याचे १३३ पदवीधर उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 05:16 IST

किती येणार निवडून?; वकिलांची कामगिरी आतापर्यंत उत्तमच; ६१ भाजपचे, ७२ काँग्रेसचे

नवी दिल्ली: आताच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन प्रमुख राजकीय पक्षांनी मिळून कायद्याचे पदवीधर असलेले एकूण १३३ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. यापैकी ६१ कायदा पदवीधर भाजपचे तर ७२ काँग्रेसचे आहेत.

स्वातंत्र्य लढ्यात व त्यानंतरच्या सरकारांमध्ये वकील असलेल्या राजकारणांनी महत्वाची पदे भूषवून मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे कायद्याचे ज्ञान असलेले किती प्रतिनिधी १७ व्या लोकसभेवर निवडून येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अर्थात या उमेदवारांमध्ये मुरब्बी राजकारण्यासोबतच मातब्बर वकील म्हणूनही ज्यांनी नाव कमावले आहे, असे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आहे. इतर बहुसंख्यांनी कायद्याची पदवी घेतल्यानंतर अत्यल्प वकिली केलेली आहे किंवा अनेकांनी तर वकिलाचा काळा झगाही कधी परिधान केलेला नाही.

काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये सलमान खुर्शीद, वीरप्पा मोईली, विवेक तनखा, मल्लिकार्जु खरगे, शशी थरूर, सुश्मिता देव व कार्ति चिदम्बरम हे प्रमुख आहेत. यापैकी खुर्शीद, मोईली, तनखा व खरगे यांना वकिलीचा प्रदीर्घ अनुभव आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये के. सी. पाडवी (नंदूरबार) व चारुलता टोकस (वर्धा) हे दोनच कायद्याचे पदवीधर आहेत.अनेकांनी कधीच वकिली केली नाहीकायद्याचे पदवीधर असलेल्या भाजपच्या उमेदवारांमध्ये रविशंकर प्रसाद, डी. व्ही. सदानंद गौडा, एन. रामचंद्र राव, नितीन गडकरी आणि मीनाक्षी लेखी हे प्रमुख आहेत. प्रसाद विद्यमान तर गौडा माजी केंद्रीय कायदामंत्री आहेत, तर राव ज्येष्ठ व्यावसायी वकील आहेत. गडकरी हे भाजपच्या महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये एकमेव कायद्याचे पदवीधर आहेत. मात्र त्यांनी वकिली कधी केलेली नाही.