शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

अपहरणाची भीती मनात बसू नये म्हणून मी चौथ्या दिवशी विमान उडवले- कॅप्टन देवी शरण

By मनोज गडनीस | Updated: January 7, 2025 05:57 IST

कंदाहार अपहरणातील आयसी-८१४ चे कॅप्टन देवी शरण निवृत्त

मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कंदाहार अपहरणानंतर वैमानिक म्हणून माझ्या मनात भीती बसू नये म्हणून भीती व तत्सम भावना मनातून झटकून टाकल्या आणि त्या घटनेच्या चौथ्याच दिवशी मी मुंबई ते कोझीकोडे (तत्कालीन कालिकत) आणि कोझीकडे ते शारजा असे विमानाचे उड्डाण केले. आज ४० वर्षे वैमानिक म्हणून काम केल्यावर माझ्या मनात केवळ उत्तम सेवा देऊ शकलो ही कृतज्ञता आहे, अशी भावना आयसी-८१४ विमानाचे उड्डाण केलेल्या कॅप्टन देवी शरण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

भारतीय हवाई उद्योगाच्या इतिहासातील सर्वाधिक भयावह घटना म्हणून नोंद झालेली कंदाहार अपहरणाची घटना २४ डिसेंबर १९९९ या दिवशी घडली होती. एअर इंडियाच्या आयसी-८१४ या विमानाने नेपाळमधील काठमांडू येथून दिल्लीसाठी उड्डाण केले आणि त्यानंतर अवघ्या ४० मिनिटांत विमानात प्रवासी म्हणून बसलेल्या पाच अतिरेक्यांनी शस्त्रे हातात घेत विमानाचे अपहरण केले.

 त्यावेळी विमानामध्ये १७९ प्रवासी आणि ११ केबिन कर्मचारी होते. अपहरण केलेले हे विमान अमृतसर, लाहोर आणि दुबई येथे फिरविण्यात आले. यादरम्यान अतिरेक्यांनी काही प्रवाशांची हत्यादेखील केली. त्यानंतर २५ डिसेंबर रोजी हे विमान अफगाणिस्तानातील कंदाहार येथे नेण्यात आले. 

अतिरेक्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी या अपहृत प्रवाशांना सोडण्यात आले. अपहरणाच्या या काळात कॅप्टन देवी शरण यांनी अत्यंत संयत भूमिका पाळली आणि अतिरेक्यांशी संवाद साधतानाच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रचंड प्रयत्न केले. वैमानिक म्हणून ४० वर्षे कामगिरी केलेले कॅप्टन देवी प्रसाद शनिवारी निवृत्त झाले. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या शहरातून दिल्लीसाठी त्यांनी अखेरचे विमान उडवले. आपल्या कारकिर्दीमध्ये २५ हजार तास विमान उड्डाण केलेल्या कॅप्टन देवी प्रसाद यांना एअर इंडिया कंपनीने अत्यंत सन्मानाने निरोप दिला.

 

टॅग्स :pilotवैमानिकairplaneविमान