शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात खटले चालवा धरणे आंदोलन : सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

By admin | Published: July 18, 2016 6:26 PM

जळगाव : बलात्कार सारखे अघोरी कृत्य करणार्‍या नराधमांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच महिला संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.

जळगाव : बलात्कार सारखे अघोरी कृत्य करणार्‍या नराधमांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच महिला संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.
सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, साहस फाउंडेशनच्या सरीता माळी, भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप सुरवाडे, शिवसेनेच्या महिला संघटक मंगला बारी, महानगरप्रमुख शोभा चौधरी, सुनिता भालेराव, लता ढोबळे, मनसेच्या वैशाली विसपुते, दिलीप सुरवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिभा शिरसाठ, शिवसेनेचे गजानन मालपुरे, माजी उपमहापौर करीम सालार, रोटरीचे गनी मेमन, वीर सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होेते. यावेळी अहमदनगर जिल्‘ातील कोपर्ली तसेच जळगावातील रामेश्वर कॉलनी भागातील पीडितेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांतर्फे घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास सर्व पक्षीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची भेट घेतली. यावेळी पीडित बालिकेच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे तसेच अहमदनगर व जळगाव येथील अत्याचाराचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली.यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी रामेश्वर कॉलनी भागातील पीडितेला मनोधैर्य योजनेतंर्गत मदत करण्यात येईल. तसेच आरोपीच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षकांना सूचना देण्यात येईल असे आश्वासन दिले.

या मागण्यांचे निवेदन केले सादर
कोपर्डी गावातील आरोपी कोणाशीही संबंधित असले तरी त्यांना शासनाने कुठलीही गय न करता हा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा.
रामेश्वर कॉलनीतील मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी.
राज्यातील मुली व महिलांना मुक्त वातावरणात वावरता यावे यासाठी मुक्त व सुदृढ वातावरण करण्यासाठी प्रचार व कायद्याबाबत जनजागृती करण्यात यावी.
पोलीस प्रशासनाबाबत लोकांच्या मनातील भीती कशामुळे कमी होतेय याबाबत गांभिर्याने आत्मचिंतन केले जावे.
अहमदनगर जिल्‘ातील अत्याच्याराच्या घटनांचे वाढते प्रमाण पाहता कायदा व सुव्यवस्थेबाबत कठोर पावले उचलण्यात यावे.
महाराष्ट्रातील सर्व बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे.