शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

१५५१ कोटी रुपयांची रोकड, अमली पदार्थ जप्त, महाराष्ट्रात सर्वाधिक दारु हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 08:23 IST

निवडणूक आयोगाची कारवाई; सोन्याचांदीच्या वस्तूही हस्तगत, महाराष्ट्रात सर्वाधिक दारु हस्तगत

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाने देशभरात आतापर्यंत बेहिशेबी रोकड, अवैध दारु, अंमली पदार्थ, सोने-चांदीच्या वस्तू असा सुमारे १५५१ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक १९ लाख लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. या गोष्टींचा वापर मतदारांना आमिष दाखविण्यासाठी करण्यात येणार होता, असे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने ३७७ कोटी रुपयांची रोकड, १५७ कोटी रुपये किमतीची दारू, ७०५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, ७८ लाख लिटर पेट्रोल, ३१२ कोटी रुपयांच्या सोने-चांदीच्या वस्तू जप्त केल्या आहेत.

मतदारांना पैसे किंवा अन्य भेटवस्तू देऊन आपल्या बाजूने वळविण्याचे राजकीय पक्षांचे प्रयत्न हाणून पाडण्याचे आयोगाने ठरविले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत अशा प्रकारच्या २९९.९४ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड निवडणूक आयोगाने जप्त केली होती. आतापर्यंत देशात तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त म्हणजे १२७.८४ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड निवडणूक आयोगाने जप्त केली आहे.२०१४च्या निवडणुकीत या राज्यातून फक्त १५.५६ कोटींची रोकड ताब्यात घेण्यात आली होती. मतदारांनी देण्यासाठीतयार केलेल्या सोने-चांदीच्या वस्तू तामिळनाडूमधूनच हस्तगत करण्यात आल्या आहेत.पंजाबमधून ११६ कोटींचे अमली पदार्थदेशात महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे १९ लाख लिटर अवैध दारु जप्त करण्यात आली आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रातून ३१ हजार लीटर अवैध दारु ताब्यात घेण्यात आली होती. पंजाबमधून ११६ कोटींचे अंमली पदार्थ निवडणूक आयोगाने जप्त केले आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदीElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक