शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

कॅशलेस म्हणजे कमी कॅश, कॅश नाहीच, असे नाही- जेटली

By admin | Published: December 25, 2016 6:21 PM

कमी पैशाच्या अर्थव्यवस्थेत प्रत्येकानं सहभाग घेतला पाहिजे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 25 - कमी पैशाच्या अर्थव्यवस्थेत प्रत्येकानं सहभाग घेतला पाहिजे. त्यामुळे भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेत पारदर्शकता येईल, असं वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. ते दिल्लीतील विज्ञान भवनात जनधन मेळ्यात बोलत होते. कॅशलेस अर्थव्यवस्थेचे फायदे सामान्य माणसांना समजले आहेत. मात्र विरोधकांना ते समजायला वेळ लागतो आहे. सर्वकाही रोख रकमेवर अवलंबून असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून निर्माण झाल्यामुळे बनावट नोटांद्वारे दहशतवादाला चालना मिळत होती, असंही जेटली म्हणाले आहेत.दरम्यान, कॅशलेस अर्थव्यवस्थेचे लोकांना अधिकाधिक फायदे मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ज्यांच्याकडे एटीएम कार्ड किंवा मोबाईल नाही, अशांना ऑनलाइन व्यवहारासाठी थंब प्रिंटची सुविधाही उपलब्ध असणार आहे. कॅशलेस म्हणजे कमी कॅश, कॅश नाहीच असे नाही. लकी ग्राहक, डिजिधन योजनांमुळे देशाला कॅशलेस करण्यात मोठी मदत होणार आहे. जगभरात आर्थिक अस्थिरता सुरू असताना भारत आर्थिकदृष्ट्या प्रगतिपथावर आहे. असाही एक काळ होता ज्यावेळी फक्त एक टक्के लोकांकडे मोबाईल होते, आज मात्र जवळपास ९० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. बँकिंग सिस्टीममध्ये पैसा आल्यावर अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल. देशाबाहेरील काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील संस्थांना संपूर्ण माहिती दिली, असंही यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं आहे.