शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भ्रष्टाचार खटल्यांत ‘सीबीआय’ ठरली यशाएवढीच अपयशीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 03:52 IST

नवी दिल्ली : भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देऊन नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या चार वर्षांत केंद्राच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय गुप्तचर संस्थेला (सीबीआय) भ्रष्टाचार खटल्यांमध्ये जवळजवळ समान यश व अपयश आल्याचे दिसते.

नवी दिल्ली : भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देऊन नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या चार वर्षांत केंद्राच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय गुप्तचर संस्थेला (सीबीआय) भ्रष्टाचार खटल्यांमध्ये जवळजवळ समान यश व अपयश आल्याचे दिसते. केंद्रीय कर्मचाºयांविरुद्धचे खटले फक्त ‘सीबीआय’ हाताळत असते, हे लक्षात घेण्यासारखे आहे.केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी बुधवारी लोकसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षांत ‘सीबीआय’ने दाखल केलेल्या भ्रष्टाचार खटल्यांमध्ये ३,६१७ आरोपींना न्यायालयांनी दोषी ठरवून शिक्षा दिल्या. तर ३,२०० आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले गेले. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोषसिद्धीचा वार्षिक आकडेवारी अशी: वर्ष २०१४- ५०९ खटल्यांत ९९३ आरोपी दोषी. सन २०१५- ४३४ खटल्यांत ८७८ दोषी. वर्ष २०१६ मध्ये ५०३ खटल्यांत १,००५ आरोपी दोषी व यंदा नोव्हेंबर अखेरपर्यंत ७४१ आरोपी दोषी. सीबीआयने केलेल्या तपासात केंद्र सरकार हस्तक्षेप करत नाही.ज्यात आरोपी निर्दोष सुटतात अशा प्रकरणांच्या निकालांची छाननी करून अपिलाबाबत निर्णय घेण्याची सीबीआयची सुप्रस्थापित अशी अंतर्गत व्यवस्था आहे. त्यानुसार निर्णय घेतले जातात, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.>जबाबदारी निश्चितीआरोपी निर्दोष सुटण्यास तपासातील त्रुटी कारणीभूत आहेत की अभियोग चालविण्यातील यादृष्टीनेही निकालपत्रांचा अभ्यास केला जातो व अ‍ॅटर्नी जनरल वा त्यांच्या प्रतिनिधींच्या सल्ल्याने जबाबदारी निश्चित केली जाते, असेही मंत्र्यांनी सांगितले.>आरोप सिद्धकरण्यात अपयशवर्ष खटले२०१४ ७४८२०१५ ८२१२०१६ ९४४२०१७* ७५५(*नोव्हेंबर अखेरपर्यंत)

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग