शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

केजरीवाल यांची सीबीआय चौकशी; अण्णा हजारेंनी परखडपणे मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 22:31 IST

अरविंद केजरीवास यांना सीबीआयची नोटीस आल्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली - सीबीआयने दारु घोटाळ्यात केजरीवालांना नोटीस पाठविल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या चार्जशीटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सीबीआयने मला बोलावले आहे आणि मी नक्की जाईन. जर अरविंद केजरीवाल भ्रष्ट असतील तर या जगात प्रामाणिक कोणी नाही... भाजपने सीबीआयला मला अटक करण्याचे आदेश दिले असतील तर सीबीआय त्यांच्या सूचनांचे पालन करेल, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी सीबीआय चौकशीवर भाजपला लक्ष्य केलं आहे. याप्रकरणी, आता केजरीवाल यांचे गुरू आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मौन सोडलं आहे. 

अरविंद केजरीवास यांना सीबीआयची नोटीस आल्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. सीबीआयकडून चौकशीला बोलविणे म्हणजे केजरीवाल यांना अटक करण्याचा कट आखण्य़ात आला आहे. यामुळे आप झुकणार नाही, व केजरीवाल देखील झुकणार नाहीत. केजरीवालांनीच भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला आहे. यामुळेच त्यांना गप्प करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे होऊ देणार नाही, असे आपच्या नेत्या आतिशी यांनी म्हटले आहे. तर, याप्रकरणी अण्णा हजारे यांनीही आपली भूमिका मांडली आहे. 

काहीतरी दोष दिसत असेल म्हणूनच चौकशी होत असेल, जर चूक केली असेल तर शिक्षा व्हायलाज पाहिजे, असे म्हणत अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांचे कुठलंही समर्थन केलं नाही. मी यापूर्वीच पत्र लिहिलं होतं, दारुबाबतच का विचार करता, चांगल्या गोष्टींचा विचार करा, पैशासाठी काहीही करणं ठीक नाही. दारुने कुणाचं भलं केलंय, असं कधीच झालं नाही. त्यामुळे, आता चौकशी निघाली आहे, सीबीआयकडून तपास सुरू आहे. कोणी दोषी आढळलं तर कारवाई करायलाच पाहिजे, असे अण्णांनी दारु घोटाळ्यातील अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीसंदर्भात विधान केलं आहे. तसेच, सिसोदियासारखा माणूस आज तुरुंगात आहे, याचं मला अतिशय दु:ख होत आहे, असेही अण्णांनी म्हटले. 

सीबीआयला घाबरणारा नाही 

सीबीआय व ईडीच्या धमक्यांना मी घाबरणारा नाही. मी वेगळ्या मातीचा आहे. या सर्वांचा मी सामना करण्यास तयार आहे. माझे शब्द कदाचित चुकीचे असतील परंतु तुमचे कर्म हे फुटके आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

सत्य समोर येईल : भाजप

सीबीआयच्या चौकशीतून सत्य समोर येणार आहे. या सर्व घोटाळयामागे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा हात असल्याचा दावा भाजपतर्फे केला जात होता. सीबीआयने दिलेल्यासमन्सने हा दावा योग्य होता, हे स्पष्ट झाल्याचे दिल्ली भाजपचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागArvind Kejriwalअरविंद केजरीवालanna hazareअण्णा हजारे