शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

सीबीएसईच्या १०वी, १२वीत मुलींचीच बाजी; तान्या सिंह, युवाक्षी वीजला ५००पैकी ५००

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 06:12 IST

गेल्या वर्षी सीबीएसईच्या १२वी परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.३७ टक्के होते ते यंदाच्या वर्षी घसरले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या १०वी व १२वीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, त्यात मुलांपेक्षा मुलींनीच अधिक बाजी मारली आहे. 

सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षेत उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या तान्या सिंह, नाेएडाची युवाक्षी वीज या विद्यार्थिनींनी  ५००पैकी ५०० गुण मिळविले आहेत. सीबीएसईने या परीक्षांसाठीची गुणवत्ता यादी यंदाही जाहीर केलेली नाही. कोरोना साथीमुळे शाळा बंद असल्याने गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रथा २०२० सालापासून बंद करण्यात आली. यंदा सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षेत ९२.७१ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या ३.२९ टक्क्यांनी अधिक आहे. या परीक्षेत ३३ हजार विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक, तर १.३४ लाख विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत.

यंदा उत्तीर्णांचे प्रमाण घसरले

- कोरोना साथीमुळे गेल्या वर्षी लेखी परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे विशेष मूल्यांकन पद्धतीद्वारे सीबीएसईने परीक्षांचा निकाल जाहीर केला होता. 

- गेल्या वर्षी सीबीएसईच्या १२वी परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.३७ टक्के होते ते यंदाच्या वर्षी घसरले आहे. 

- हेच प्रमाण २०१९मध्ये ८३.४० टक्के, २०२० साली ८८.७८ टक्के होते. सीबीएसईच्या १०वी परीक्षेतही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. 

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा