शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सीबीएसई परीक्षेचा निकाल जाहीर, उत्तर प्रदेशातील मेघना श्रीवास्तव पहिली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 13:38 IST

 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत देशभरात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला आहे .या परीक्षेत ८३.०१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

नवी दिल्ली :   केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत देशभरात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला आहे .या परीक्षेत ८३.०१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तर प्रदेशातील स्टेप बाय स्टेप महाविद्यालातील मेघना श्रीवास्तव बोर्डात पहिली आली आहे.तिला ५००पैकी ४९९ गुण मिळाले आहेत. तिने गाझियाबाद विभागातून परीक्षा दिली. पहिल्या तीन क्रमांकावर एकूण नऊ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून ८८.३१टक्के मुली तर ७८.९९ मुलांनी यश मिळवले आहे. दिव्यांग विभागातून विजय गणेश हा विद्यार्थी ५०० पैकी ४९२गुण मिळवत पहिला आला आहे. निकालानुसार एकूण १२हजार ७३७ विद्यार्थ्यांनी ९५टक्क्यांपेक्षा जास्त तर ७२हजार ५६९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादित केले आहेत. 

 यंदा इयत्ता बारावीची परीक्षा दि. ५ मार्च ते १३ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी देशभरातून सुमारे ११ लाख ८६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांची भारतातील ४ हजार १३८  तर परदेशातील ७१ केंद्रांवर परीक्षा झाली. मंडळाच्या www.cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहेत. 

      

ठळक मुद्दे :

  • २०१७-१८सालचा सीबीएसई बोर्डाचा बारावी निकाल जाहीर, ८३.०१ विद्यार्थी उत्तीर्ण 

 

  • उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले, मागील वर्षी ८२.२टक्के विद्यार्थी उत्तीर्ण 

 

  • यंदाही मुलींची बाजी, उत्तीर्णांमध्ये ८८.३१ टक्के मुली आणि ७८.९९टक्के मुलांचा समावेश 

 

  • त्रिवेंद्रम विभागातून ९७.३२टक्के, चेन्नई विभागातून ९३.८७टक्के तर दिल्ली विभागातून ८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण 

 

  • यंदाच्या निकालानुसार एकूण १२हजार ७३७ विद्यार्थ्यांनी ९५टक्क्यांपेक्षा जास्त तर ७२हजार ५६९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादित केले आहेत. 

 

  • विदेशी शाळांमधील ९४. ९४टक्के विद्यार्थी उत्तीर्ण 

 

  • यंदा १०वी आणि १२वी मिळून सीबीएसई बोर्डामार्फत २८ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यात १६ लाख ३८हजार विद्यार्थ्यांनी दहावीची तर ११ लाख ८६हजार विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. 

 

  • सीबीएसई इतिहासात पहिल्यांदाच पेपर फुटीच्या प्रकरणामुळे सीबीएसई बोर्ड चर्चेत आले होते. यामध्ये १०वीचा गणित तर १२वीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला होता. अखेर चर्चेनंतर १०वीची पुनर्परीक्षा घेण्यात आली नाही तर १२वीची अर्थशास्त्राची पुनर्परीक्षा २५एप्रिलला पार पडली. 

 

  • मागील्या वर्षी आलेल्या परीक्षेत नोएडा येथील रक्षा गोपाळ पाहिली, चंदीगढची भूमी सावंत दुसरी तर आदित्य जैन आणि मनंत लुथरा संयुक्तपणे तिसरे आले होते.  
टॅग्स :CBSE 12th Result 2018सीबीएसई बारावी परीक्षा निकाल २०१८New Delhiनवी दिल्लीCBSE Examसीबीएसई परीक्षा