शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

बिपीन रावत अन् मधुलिका रावत यांच्या अस्थींचे गंगेत विसर्जन; दोन्ही लेकी भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 17:14 IST

आज बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या अस्थींचे उत्तराखंडमधील हरिद्वार गंगेत विसर्जन करण्यात आले. 

नवी दिल्ली - तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या पार्थिव देहावर शुक्रवारी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या अस्थींचे उत्तराखंडमधील हरिद्वार गंगेत विसर्जन करण्यात आले. 

जनरल बिपीन रावत यांच्या दोन्ही मुली आज सकाळी दिल्ली येथून लष्कराच्या विशेष विमानाने त्यांचे वडील बिपीन रावत आणि आई मधुलिका रावत यांच्या अस्थी घेऊन हरिद्वारला पोहोचल्या होत्या. दोघांनी हिंदू रीतिरिवाजानूसार अस्थी गंगा नदीत विसर्जन केल्या. वडील आणि आईच्या अस्थीविसर्जन करताना दोन्ही मुली भावूक झाल्याचे दिसून आले. 

तत्पूर्वी, जनरल रावत यांची अखेरची यात्रा अत्यंत भावनिक होती. संपूर्ण मार्गावर फुलांचा वर्षाव केला होता आणि हाती तिरंगा घेऊन जनरल बिपीन रावत अमर रहेच्या घोषणाही दिल्या जात होत्या. अंत्यसंस्काराच्या वेळी आर्मी कँट भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमले होते. यावेळी भारताचे तिन्ही लष्करप्रमुख आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जनरल रावत यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. जनरल रावत यांना 17 तोफांची सलामी देण्यात आली. यापूर्वी कधीही एखाद्या लष्करी अधिकाऱ्याच्या अंतिम दर्शनासाठी एवढी गर्दी जमली नव्हती. उपस्थितांनी पानावलेल्या डोळ्यांनी आपल्या हिरोला अखेरचा निरोप दिला.

अंत्ययात्रेला जनसागर उसळला-

जनरल बिपीन रावत यांच्या अंत्ययात्रेला दिल्लीत जनसागर उसळला होता. आपल्या वीर योद्ध्याच्या सन्मानार्थ ‘अमर रहे… अमर रहे…  जनरल अमर रहे’, ‘वंदे मातरम…’ ‘भारत माता की जय…’ ‘जब तक सूरज चांद रहेगा, बिपीनजी का नाम रहेगा…’ च्या घोषणा दिल्या होत्या. बिपीन रावत यांचे पार्थिव घेऊन येणाऱ्या वाहनाच्या सोबत शेकडो लोक हातात तिरंगा घेऊन घोषणा देत होते. दिल्लीच्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत जनरल रावत यांच्यावर अंत्यविधी पार पडले. त्यांच्या कन्येने मुखाग्नी दिल्यावर उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

चार देशाचे उच्च अधिकारी उपस्थित-

सीडीएस बिपीन रावत यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोक तर जमले होते. शिवाय, श्रीलंका, भूतान, नेपाळ आणि बांगलादेशातील सैन्याचे कमांडरही या वीर योद्ध्याला अखेरची सलामी देण्यासाठी आले होते. सीडीएस बिपीन रावत यांच्यासह तामिळनाडूच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सर्व 13 जणांना शुक्रवारी अखेरचा निरोप देण्यात आला. 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानIndiaभारत