शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

केंद्र व राज्याचे मंत्रीही ‘आरटीआय’च्या घेऱ्यात

By admin | Published: March 14, 2016 2:48 AM

केंद्र व राज्यांचे कॅबिनेट मंत्री हे ‘सार्वजनिक अधिकारी’ आहेत आणि माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) त्यांना जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणे व नागरिकांनी मागितलेली माहिती पुरविणे बंधनकारक आहे

नवी दिल्ली : केंद्र व राज्यांचे कॅबिनेट मंत्री हे ‘सार्वजनिक अधिकारी’ आहेत आणि माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) त्यांना जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणे व नागरिकांनी मागितलेली माहिती पुरविणे बंधनकारक आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल केंद्रीय माहिती आयुक्तांनी दिला.मंत्र्यांना आरटीआयच्या कक्षेत आणल्यानंतर आता लोकांना आरटीआय अंतर्गत अर्ज दाखल करून कोणत्याही मंत्र्याला थेट प्रश्न पाठवून त्याचे उत्तर मागितले जाऊ शकेल. ‘केंद्र व राज्य सरकारांनी काही अधिकारी नामनियुक्त करून किंवा लोक माहिती अधिकारी तसेच प्रथम अपीलेट अधिकाऱ्याच्या रूपात नियुक्ती करण्यास प्रत्येक मंत्र्याला आवश्यक ती साहाय्यता पुरविण्यात यावी, अशी शिफारस करण्यात येत आहे,’ असे माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी आदेशात म्हटले. ‘गोपनीयतेची शपथ’ऐवजी ‘पारदर्शकतेची शपथ’ या शब्दाचा वापर करण्यात आला पाहिजे, ज्यामुळे मंत्रीदेखील नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचा सन्मान करतील आणि नागरिकांप्रति उत्तरदायी राहतील, असे निर्देश आचार्युलू यांनी दिले. अहमदनगरचे रहिवासी हेमंत ढगे यांच्या प्रकरणात निकाल जाहीर करताना आचार्युलू यांनी हे निर्देश दिले. कॅबिनेट आणि राज्यांच्या मंत्र्यांची लोकांना भेटण्याची वेळ कोणती, असा प्रश्न ढगे यांनी तत्कालीन केंद्रीय कायदा व न्याय मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांना विचारला होता. तुम्ही स्वत: मंत्र्यांनाच भेटा, असे ढगे यांना सांगण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)दावा केला अमान्यमाहितीचा अधिकार कायद्यांतर्गत माहिती उपलब्ध करून दिली जाऊ शकेल, अशी आवश्यक संरचना कॅबिनेट स्तरावरील मंत्र्यांजवळ उपलब्ध नसते आणि मंत्री हा केवळ ‘एक व्यक्ती कार्यालय’ असल्याने त्याला सार्वजनिक अधिकारी मानले जाऊ शकत नाही, हा दावा मान्य केला जाऊ शकत नाही, असे आचार्युलू यांनी या आदेशात नमूद केले आहे. रामायणाचा उल्लेख करताना आचार्युलू म्हणाले, ‘रामाने आपल्या महालाच्या प्रवेशद्वारावर एक घंटा बांधलेली होती. जो कुणी ही घंटा वाजवित असे, त्याला भेटण्यासाठी आणि त्याची समस्या ऐकण्यासाठी राम महालाबाहेर येत असे. ही बाब रामराज्यात तक्रारींचे निराकरण करण्याच्या व्यवस्थेचे निदर्शक आहे.’तुम्ही मंत्र्याकडे जाऊन भेटीची वेळ मागा, असे सार्वजनिक अधिकाऱ्याने (कायदा व न्याय मंत्रालय) अपीलकर्त्याला निर्देश देणे उचित ठरत नाही. एका नागरिकाला आपण निवडून पाठविलेल्या मंत्र्याच्या भेटीची वेळ आणि त्याच्या प्रक्रियेबाबत जाणून घेण्यासाठी आरटीआय अर्ज दाखल करावा लागणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा प्रकारची माहिती कलम ४ (१) (बी) अन्वये स्वेच्छेने पुरविण्यात आली पाहिजे, असेही आचार्युलू यांनी स्पष्ट केले.