शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

स्वतंत्र झेंड्याची कर्नाटकची मागणी केंद्राने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 9:38 AM

स्वतंत्र झेंड्याची कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्दारमय्या यांची मागणी केंद्र सरकारनं फेटाळून लावली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि, 19- स्वतंत्र झेंड्याची कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्दारमय्या यांची मागणी केंद्र सरकारनं फेटाळून लावली आहे. राज्यघटनेत राज्यांच्या स्वतंत्र झेंड्याची कुठलीही तरतूद नाही, असं म्हणत केंद्र सरकारनं ही मागणी फेटाळून लावली. राज्यघटनेतील ‘एक देश, एक ध्वज’ या सिद्धांताच्या आधारावर तिरंगा हाच संपूर्ण देशाचा ध्वज आहे, असंही केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
आपला एकच देश आहे आणि एकच ध्वज आहे, असं गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. राज्यांना स्वतंत्र ध्वज देण्याची परवानगी देणारी अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. कर्नाटक राज्याचा एक ध्वज आहे, जो जनतेचं प्रतिनिधीत्व करतो, पण सरकारचं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 
आणखी वाचा
 

पाकिस्तानच्या मोर्टर हल्ल्यात सापडलेल्या 217 विद्यार्थ्यांची केली सुटका

RJ मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या अळ्या, मुंबई मनपानं बजावली नोटीस

गोव्यात बीफची कमतरता भासू देणार नाही - मनोहर पर्रीकर

कर्नाटकमधल्या कॉंग्रेसप्रणीत सरकारने वेगळा झेंड्याची मागणी केली आहे. यासाठी राज्य सरकारने 9 सदस्यांची ध्वज समिती स्थापन केली आहे. यापुर्वी 2012 मध्येही कर्नाटकमधून स्वतंत्र झेंड्याची मागणी करण्यात आली. पण केंद्रातील तत्कालिन सरकारने ही मागणी फेटाळली होती. असं केल्यास देशातील एकता आणि अखंडताचा भंग ठरेल असं म्हणत ही मागणी वाजपेयींनी फेटाळली होती. त्यानंतर आता पुन्हा या मागणीने डोकं वर काढलं आहे. 

 
कर्नाटकमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी झेंड्याचा आराखडा बनवण्यासाठी एक 9 सदस्यांची समितीही स्थापन करण्याता आली आहे. या समितीचे अध्यक्षपद कर्नाटकच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुखांकडे सोपवण्यात आले आहे. आता ही समिती झेंड्याचा आराखडा बनवून राज्य सरकारला सोपवेल. वेगळा झेंडा बनवण्याची कर्नाटक सरकारचा घाट यशस्वी झाल्यास जम्मू काश्मीरनंतर स्वतंत्र ध्वज असणारे कर्नाटक हे देशातील दुसरे राज्य ठरू शकते. असे झाल्यास अन्य राज्यांकडूनही स्वतंत्र ध्वजाची मागणी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 
 
मात्र कर्नाटक सरकारच्या या योजनेस भाजपाकडून विरोध होत आहे. राज्याच्या दुसरा ध्वज बनवल्यास तिरंग्याचे महत्त्व कमी होईल. तसेच त्यातून अखंडतेच्या भावनेला धक्का लागेल, असंही काही जणांचं मत आहे. तर केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनीही या मागणीस विरोध केला आहे.