शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल केंद्र असंवेदनशील, सोनिया गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 06:47 IST

गांधी यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सॲप चॅटवरून सरकार राष्ट्रीय सुरक्षेशी खेळत असल्याचे म्हटले. बिघडलेली अर्थव्यवस्था, महागाई आणि सामान्य नागरिकांसाठी कोरोना लस आदी मुद्यांवरून त्यांनी कठोर टीका केली.

शीलेश शर्मा -नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल पूर्णपणे असंवेदनशील आणि अहंकारी आहे, असा हल्ला काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी केला. गांधी यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सॲप चॅटवरून सरकार राष्ट्रीय सुरक्षेशी खेळत असल्याचे म्हटले. बिघडलेली अर्थव्यवस्था, महागाई आणि सामान्य नागरिकांसाठी कोरोना लस आदी मुद्यांवरून त्यांनी कठोर टीका केली. पक्षाने तीन प्रस्ताव संमत करून काँग्रेस शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून गटापासून ते राज्यांपर्यंत आंदोलन, घेराव आणि संमेलन घेईल.  गट (ब्लॉक) स्तरावर १० फेब्रुवारीपर्यंत, जिल्हा स्तरावर २० फेब्रुवारीपर्यंत आणि राज्यांत २८ फेब्रुवारीपर्यंत हे कार्यक्रम चालतील, अशी घोषणा केली.

गोस्वामीप्रकरणी पक्षाने संयुक्त संसदीय समिती स्थापन करून चौकशीची मागणी केली. अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्ग आणि गरिबांना कोरोनावरील लस मोफत देण्याची घोषणा सरकारने करावी, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. राष्ट्रीय सुरक्षेवरील संमत प्रस्तावात पंतप्रधान आणि केंद्र सरकार पूर्णपणे मौन आहे. वस्तुस्थिती ही आहे की, त्यांचे मौन, त्यांची हातमिळवणी, गुन्ह्यांत सहभाग या सगळ्या गोष्टी प्रथमदृष्ट्या दोषी असल्याचे पुरावे आहेत.

‘शेतकऱ्यांमध्ये सरकार फूट पाडत आहे’ --    पक्षाने प्रस्तावात तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून, धमक्या देऊन त्यांच्याशी सावत्र व्यवहार करत आहे. -    तिसऱ्या प्रस्तावात पक्षाने स्पष्ट केले की, लसीकरणाचा कार्यक्रम असा राबवला गेला पाहिजे की त्यातून जनतेचा विश्वास वाढेल.-   आघाडीवरील आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय राज्य सरकारांना त्यांच्या राज्यांत लसीकरणाचा क्रम ठरवण्याचा पर्याय दिला पाहिजे. त्यामुळे लसीकरण कार्यक्रम वेगाने व प्रभावशालीरीत्या पुढे सरकेल. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीSonia Gandhiसोनिया गांधीCentral Governmentकेंद्र सरकार