शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

काश्मीरच्या निवडणुकांसाठी केंद्र तयार, गृहमंत्री राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 05:13 IST

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप-पीडीपी आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर, राज्यात कोणत्याही पक्षाने सरकार बनवण्याचा दावा केला नाही.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये भाजप-पीडीपी आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर, राज्यात कोणत्याही पक्षाने सरकार बनवण्याचा दावा केला नाही. राज्यात भाजपला सरकार बनवायचे असते, तर ६ महिन्यांच्या कालावधीत तसा प्रयत्न पक्षाने नक्कीच केला असता; मात्र भाजपने तसा कोणताही प्रयत्न केला नाही. राज्यपालांनी वास्तव परिस्थितीचा अहवाल केंद्राकडे पाठवला. अशा स्थितीत राज्यघटनेच्या अनुच्छेद ३५६ चा अवलंब करण्याशिवाय केंद्राकडेही पर्याय राहिला नाही. निवडणुकीसाठी केंद्र सरकार सर्वार्थाने तयार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी लोकसभेत केले. जम्मू-काश्मीरमधे अनुच्छेद ३५६ अन्वये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर या घटनात्मक प्रक्रियेला संसदेच्या मंजुरीसाठी झालेल्या चर्चेला उत्तर देताना राजनाथसिंग बोलत होते.जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया प्रस्थापित व्हावी, राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. निवडणुका आयोजित करण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे; मात्र या निवडणुकांसाठी आयोगाने सरकारकडे सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली, तर ती पुरवण्यास केंद्र सरकार सदैव तयार आहे, असे नमूद करीत गृहमंत्री म्हणाले, सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन दोनदा मी काश्मीरला गेलो.समाधानकारक तोडगा काढूकाश्मीरची स्थिती अतिशय नाजूक होती तेव्हा लवकरात लवकर ती सुधारावी, अशीच सरकारची प्रामाणिक इच्छा होती. सर्वपक्षीय शिष्टमंडळातले काही नेते फुटीरवादी गटांनाही भेटायला गेले होते. तेथून त्यांना कसे परतावे लागले, याचा उल्लेख ते करीत नाहीत. विद्यमान स्थितीत जम्मू-काश्मीरमध्ये लोकतंत्र मजबूत व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे.सर्वच राजकीय पक्षांना माझे आवाहन आहे की, काश्मीरची स्थिती सामान्य व्हावी, यासाठी नेमके काय केले पाहिजे, याबद्दल आपल्या सूचना अवश्य करा. समाधानकारक तोडगा काढण्याचा गृहमंत्री या नात्याने मी व्यक्तिश: प्रयत्न करायला तयार आहे. अनुच्छेद ३५६ बाबत काश्मीरविषयक चर्चेत समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, राजदचे जयप्रकाश नारायण सिंग यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, मार्क्सवादी, अद्रमुक आदी पक्षांच्या खासदारांनी भाग घेतला.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीर