शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

NEET बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचं केंद्रानं केलं स्वागत, शिक्षणमंत्री म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 23:51 IST

Supreme Court Verdict On NEET Exam: मागच्या दोन महिन्यांपासून गाजत असलेल्या नीट यूजी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालाचं केंद्र सरकारने स्वागत केले आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. 

मागच्या दोन महिन्यांपासून गाजत असलेल्या नीट यूजी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. तसेच पेपरफुटीच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. तसेच तसेच परीक्षेची पवित्रता भंग करण्याबाबत सबळ पुरावे सापडलेले नाहीत, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये म्हटले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालाचं केंद्र सरकारने स्वागत केले आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. 

 नीट परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, सत्यमेव जयते! आम्ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचं स्वागत करतो. आमचे प्राधान्यक्रम असलेले विद्यार्थी आणि त्यांचं भविष्य यावर सरकार नेहमीच विश्वास ठेवल आलं आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचेही आभार मानतो. समाजातील दुर्बल घटक, एससी, एसटी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांमधील कमकुवत वर्ग यांनाही विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा नीट परीक्षा न घेण्याचा निर्णय दिला आहे.

दरम्यान, ४ जून रोजी नीट परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर पेपर लीक प्रकरणावरून काही विद्यार्थी आक्रमक झाले होते. सर्वप्रथम बिहारमध्ये या परीक्षेचे पेपर फुटल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर देशभरात हे प्रकरण पेटत गेले. तसेच देशातील विविध न्यायालयांमध्ये नीटबाबत याचिका दाखल केल्या. तसेच पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली गेली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्व याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी सुरू झाली. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने आज या प्रकऱणी निकाल दिला. तसेच परीक्षेत व्यापक प्रमाणात गडबड झाली नसल्याचे निरीक्षण नोंदवाताना पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी फेटाळून लावली. 

टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार