शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

केंद्र मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 8:04 AM

मागील ५० दिवसांपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारात १०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचार लवकरात लवकर नियंत्रणात आणला पाहिजे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० जून रोजी अमेरिका व इजिप्तच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना आणि सरकारला कळवला असल्याचे समजते. मागील ५० दिवसांपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारात १०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

अनेक घरांचे नुकसान झाले आहे व ५० हजारांपेक्षा अधिक लोक बेघर झाले आहेत. भाजपसह कुकी आमदारांनी या हिंसाचारात राज्य पोलिस दोषी असल्याचा आरोप केला आहे. या भागात वर्चस्व असलेल्या मैतेईंचे म्हणणे आहे की, आसाम रायफल्स कुकी बंडखोरांना मदत करीत आहेत. मोदी सरकारमधील सूत्रांचे म्हणणे आहे की, नऊ वर्षांत पंतप्रधानांनी कोणत्याही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली नाही.

प. बंगालमधील हिंसाचारानंतर सरकार बरखास्त करण्याचा दबाव होता. परंतु सरकारने सरकार बरखास्त करण्यासाठी कलम ३५६चा वापर केला नाही. मणिपूरमधील स्थिती नियंत्रणात आणण्यास मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह असमर्थ ठरत असल्यामुळे त्यांना कायम ठेवण्याबाबत भाजप द्विधा मन:स्थितीत आहे.

मणिपूर ५० दिवसांपासून जळत आहे : राहुल गांधीपंतप्रधान मोदी देशात नसताना मणिपूर मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. यावरून त्यांच्यासाठी (मोदी) मणिपूरचा मुद्दा महत्वाचा नाही हे स्पष्ट होते, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार