शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

सर्व भारतीयांना मायदेशी आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे; वंदे मातरम मोहिमेच्या धर्तीवर प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 6:17 AM

Jyotiraditya Scindia : केंद्र सरकारने मंगळवारी काबूलच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना विशेष विमानाने भारतात परत आणले. वंदे मातरम मोहिमेसाठी एअर इंडिया व भारतीय हवाई दलाची विमाने वापरण्यात आली होती. 

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. कोरोना साथीमुळे इतर देशांत अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे मातरम मोहीम राबविली होती. अगदी त्याच धर्तीवर अफगाणिस्तानातील भारतीयांसाठी आमचे प्रयत्न जारी आहेत, असेही ते म्हणाले.अफगाणिस्तानमध्ये तालिबानींनी सत्ता काबीज केली असून, त्यामुळे तिथे राहणारे विविध देशांतील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर आपल्या मायदेशी परत जायचे आहे. केंद्र सरकारने मंगळवारी काबूलच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना विशेष विमानाने भारतात परत आणले. वंदे मातरम मोहिमेसाठी एअर इंडिया व भारतीय हवाई दलाची विमाने वापरण्यात आली होती. मध्य प्रदेशमधील शाजापूर येथे शिंदे यांनी जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्याच्या मोहिमेस केंद्र सरकारने १३ ऑगस्टपासून सुरुवात केली आहे. मात्र गेल्या रविवारी विमान अफगाणिस्तानातील भारतीयांना घेऊन उड्डाण करणार होते, त्याच्या आधीच काबूल विमानतळावर गोळीबार झाला. त्यामुळे धोक्याची सूचना मिळाल्यामुळे हे उड्डाण त्यावेळी होऊ शकले नव्हते. तसेच काबूलची हवाई हद्दही त्यावेळी बंद करण्यात आली होती. 

एस. जयशंकर यांची गुटेरस यांच्याशी चर्चाअफगाणिस्तानातील स्थितीसंदर्भात परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस व अन्य अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा केली. तालिबानने अफगाणिस्तानमधील सत्ता बळकावली.  त्यामुळे त्या देशात गोंधळ माजला आहे,त्याबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलाविण्यात आली.  

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान