शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

BREAKING: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न; मोदी सरकारची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 20:12 IST

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

नवी दिल्ली: बिहारचे माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केंद्र सरकारने केली. त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात येणार आहे. बुधवारी कर्पुरी ठाकूर यांची १०० वी जयंती असून, या पूर्वसंध्येला सरकारने ही मोठी घोषणा केली. जनता दल युनायटेडने (JDU) कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. ठाकूर यांना भारतरत्न मिळणार असल्याची माहिती राष्ट्रपती भवनातून निवेदन जारी करून देण्यात आली. सरकारच्या या निर्णयानंतर जदयूने मोदी सरकारचे आभार मानले.  

कर्पुरी ठाकूर यांचा मुलगा रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की, आम्हाला ३६ वर्षांच्या तपश्चर्येचे अखेर फळ मिळाले आहे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि बिहारच्या १५ कोटी जनतेच्या वतीने सरकारचे आभार मानू इच्छितो.

कोण होते कर्पुरी ठाकूर?बिहारचे जननायक म्हणून कर्पुरी ठाकूर यांची ओळख होती. कर्पुरी ठाकूर १९७० च्या दशकात दोनदा बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. विशेष म्हणजे ते बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्रीही होते. स्वातंत्र्यसैनिक असण्यासोबतच शिक्षक म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला. मागासलेल्या समाजातून आलेला नेता म्हणून त्यांनी जनतेच्या मनात घर केले. मंडल आंदोलनापूर्वीही ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण दिले होते. लोकनायक जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया हे त्यांचे राजकीय गुरू होते. 

२४ जानेवारी १९२४ रोजी जन्मलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांची ओळख स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक आणि ज्येष्ठ समाजवादी राजकारणी अशी राहिली. जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया हे त्यांचे राजकीय गुरू होते. त्यांनी दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्रिपद भूषवले. तसेच उपमुख्यमंत्री, मंत्री, विरोधी पक्ष नेते अशी विविध पदेही भूषवली होती. त्याबरोबरच १९५२ साली पहिल्यांदा आमदार बनल्यानंतर ते दीर्घ राजकीय कारकिर्दीत एकदाही पराभूत झाले नव्हते. आजच्या बिहारच्या राजकारणातील प्रभावी नेते मानले जाणारे लालूप्रसाद यादव, नितीश कुमार, सुशील कुमार मोदी हे त्यांचे शिष्य आणि राजकीय राजकीय वारसदार मानले जातात.

१९५२ मध्ये पहिल्यांदा आमदार...एक लढवय्या नेता म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या कर्पुरी ठाकूर यांनी १९५२ मध्ये ताजपूर विधानसभा मतदारसंघातून सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून विजयी होऊन प्रथमच आमदार होण्याचा मान पटकावला. १९६७ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत युनायटेड सोशलिस्ट पार्टी कर्पुरी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास आली. याचा परिणाम राज्यातील सत्तेवरही झाला अन् काँग्रेसला जनतेने नाकारले. तेव्हा बिहारमध्ये प्रथमच बिगर काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाले.

टॅग्स :BiharबिहारBharat Ratnaभारतरत्न