शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
2
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
3
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
4
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
5
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
6
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
7
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
9
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
10
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
11
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
12
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
13
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
14
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
15
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
16
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
17
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
18
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
19
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
20
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम

"तुम्ही ठोस कारवाई का केली नाही?"; १०० हून अधिक विमानांना धमक्या मिळाल्यानंतर भडकले केंद्र सरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 3:55 PM

विमानातील बॉम्बच्या धमक्यानंतर केंद्र सरकारने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सला फटकारले आहे.

Flight Bomb Threats : गेल्या काही दिवसांपासून विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या येत असताना, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला फटकारले आहे. गेल्या काही दिवसांपासून विमानात बॉम्ब असल्याच्या अनेक फसव्या धमक्या या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन पसरवल्या जात होत्या. त्यानंतर संतापलेल्या केंद्र सरकारने एक्सच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. बॉम्बच्या धमक्यांमुळे विमान सेवेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून कोट्यवधींचे नुकसान झालं आहे.

गेल्या काही दिवसांत १०० हून अधिक विमानांवर बॉम्ब हल्ल्याच्या धमक्या मिळाल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. तसेच या धमक्यांमुळे विमान वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने या विरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या अधिकाऱ्यांना (पूर्वीचे ट्विटर) फटकारले आहे. तसेच अशा अफवांना सामोरे जाण्यासाठी ठोस कारवाई कारवाई का केली नाही असा सवाल देखील केला आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे सहसचिव संकेत एस भोंडवे यांनी बुधवारी विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आणि एक्स, मेटा सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या अधिकाऱ्यांसोबत व्हर्च्युअल बैठक केली. या अध्यक्षस्थाथी असलेल्या भोंडवे यांनी एक्सवर नाराजी व्यक्त केली. तसेच सोशल मीडियावर या प्रकारच्या गुन्ह्याला प्रोत्साहन दिले जात असल्याचेही भोंडवे म्हणाले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत मंत्रालयाचे सहसचिव संकेत एस भोंडवे यांनी सोशल मीडिया कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आणि हे गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यासारखे कृत्य असल्याचे म्हटलं आहे. विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमक्या देणाऱ्या खात्यांच्या युजर्सचा आयडी किंवा डोमेनचे तपशील मिळविण्यात दिल्ली पोलिस अयशस्वी झाल्यानंतर केंद्राने सोशल मिडिया कंपन्यांवर रोष व्यक्त केला. विमान कंपन्यांच्या दोन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या धमक्यांमुळे विमान कंपन्यांना सुमारे ६०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत भारतीय विमान कंपन्यांच्या १२० हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. मंगळवारी देखील इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाच्या ३० विमानांना अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या. विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले की या कालावधीत त्यांनी अधिकाऱ्यांना सतर्क करून सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले. मात्र, आतापर्यंतच्या सर्व धमक्या अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र यामुळे हजारो प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागले आणि सुरक्षा यंत्रणांचे प्रचंड हाल झाले. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारSocial Mediaसोशल मीडियाAir Indiaएअर इंडिया