शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

केंद्र सरकारने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली

By admin | Published: January 08, 2016 11:52 AM

ग्रामीण भागांत अतिशय लोकप्रिय असलेल्या बैलगाडीच्या शर्यतीवरील बंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून आता गावागावांमध्ये पुन्हा ढवळ्या-पवळ्याची जोडी शर्यतीत धावताना दिसेल.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - ग्रामीण भागांत अतिशय लोकप्रिय असलेल्या बैलगाडीच्या शर्यतीवरील बंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून आता गावागावांमध्ये पुन्हा ढवळ्या-पवळ्याची जोडी शर्यतीत धावताना दिसणार आहे. 
बैलागाड्यांची शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यासंदर्भात केंद्रीय पातळीवर विचारही सुरू होता. अखेर आज सरकारने ही मागणी मान्य करत बैलांच्या शर्यतीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. मात्र ही परवानगी देतानाच सरकारने काही अटीही घातल्या आहे. या शर्यती आखून दिलेल्या मार्गावरच घेण्यात याव्यात, तसेच त्यांची लांबी २ किलोमीटरपेक्षा जास्त नसावी. शर्यतीपूर्वी बैलांची पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांकडून तपासणी करून घेण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
या शर्यतींदरम्यान बैलांनी जोरात धावावे यासाठी, त्यांना उत्तेजन देण्यासाठी त्यांचे हाल केले जातात, असे सांगत प्राणीमित्र संघटनांनी या शर्यतींना विरोध केला होता. त्या आधारावर पूर्वी काँग्रेस सरकारने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. 
मात्र शेतकरी नेहमीच आपल्या बैलांची काळजी घेतात, त्यांचा प्रेमाने सांभाळ करतात, शर्यतीसाठी धावणा-या बैलांची तर विशेष काळजी घेतली जाते असा दावा शेतक-यांतर्फे केला जात होता. मात्र तरीही शर्यतींवर बंदी लादण्यात आल्याने शेतक-यांमध्ये नाराजी होती, काही ठिकाणी तर शेतक-यांनी या निर्णयाविरोधात आंदोलनेही केली. अखेर आज सरकारने त्यांची मागणी मान्य करत शर्यतींवरील बंदी उठवल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 
दरम्यान पेटा ( पीपल फॉर दि एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स) या प्राणीमित्र संघटनेने या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ' केंद्र सरकारचा हा निर्णय असंविधानिक व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात असून आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करू' असे म्हटले आहे.