शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

काश्मीरच्या अशांततेला केंद्र सरकार जबाबदार

By admin | Published: June 05, 2017 4:13 AM

जम्मू आणि काश्मीरमधील सध्याची अशांतता आणि अस्वस्थतेचा ठपका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर ठेवला

लोकमत न्यूज नेटवर्कचेन्नई : जम्मू आणि काश्मीरमधील सध्याची अशांतता आणि अस्वस्थतेचा ठपका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर ठेवला. ते रविवारी येथे म्हणाले, ‘केंद्र सरकार काश्मीरचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळत असून, भाजप-पीडीपी ही काश्मीरमधील युती ‘अकार्यक्षम’ आहे. काश्मीर खोऱ्यात शांतता निर्माण करू हे दिलेले आश्वासन पोकळ ठरले आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी अरुण जेटली मला भेटायला आले होते. तुम्ही काश्मीरचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळत आहात व काश्मीरला आगीच्या तोंडी उभे करीत आहात, असे मी त्यांना सांगितले.जेटली यांनी माझे म्हणणे दूर सारून काश्मीरमध्ये शांतता असल्याचे सांगितले, असे राहुल गांधी म्हणाले. भारत सरकार आणि पंतप्रधान काश्मीरचा प्रश्न पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने हाताळत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. देशावर एकच विचार लादण्याचा व देशाची विविधता धोक्यात आणण्याचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव विरोधी पक्ष एक होऊन उधळून लावतील. देशावर एकच विचार थोपावला जातोयप्रत्येक राज्याला स्वत:चा विचार आणि संस्कृती, अभिव्यक्ती आणि खानपान आहे. ही विविधता हेच देशाचे बळ आहे, दुबळेपणा नाही, असे राहुल गांधी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. जी शक्ती आहे तो भाजपसाठी दुबळेपणा आहे व वेगवेगळ्या कल्पना तो नष्ट करू पाहतोय. देशावर एकच विचार थोपवता येईल, असा विचार तो करतोय, असा आरोप त्यांनी केला.