शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वृद्धांना केंद्र सरकार देणार मोफत उपचार; संसदेत राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 07:52 IST

राष्ट्रपतींनी केंद्र सरकारची आगामी काळातील ध्येयधोरणे आणि उद्दिष्टे याबाबतही सविस्तर विवेचन केले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतातील जनतेने मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला तिसऱ्यांदा स्पष्ट आणि स्थिर जनादेश दिला आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना सांगितले. यावेळी राष्ट्रपतींनी केंद्र सरकारची आगामी काळातील ध्येयधोरणे आणि उद्दिष्टे याबाबतही सविस्तर विवेचन केले. 

आयुष्मान भारत आरोग्य योजनेअंतर्गत ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना मोफत उपचार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. १८ वी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर संसदेच्या संयुक्त बैठकीमध्ये नवीन खासदारांचे अभिनंदन करीत मुर्मू यांनी ते भारतातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माध्यम म्हणून काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. युद्धांदरम्यान वर्चस्वासाठी सशस्त्र दलांत सुधारणा ही निरंतर प्रक्रिया असल्याचे ते म्हणाले.

आणीबाणी हा सर्वांत मोठा काळा अध्याय- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आणीबाणी राज्यघटनेवर थेट हल्ल्याचा सर्वांत मोठा आणि काळा अध्याय आहे. अशा असंवैधानिक शक्तींवर देशाने विजय मिळवला,असे नमूद केले. - राष्ट्रपतींनी भाषणात आणीबाणीचा उल्लेख केल्यावर काही विरोधी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, त्याकडे राष्ट्रपतींनी दुर्लक्ष केले. 

२५,००० जन औषधी केंद्रे देशभरात सुरू- आयुष्मान भारत आरोग्य योजनेअंतर्गत ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना मोफत उपचार देण्यात येणार. देशात २५००० जन औषधी केंद्रे सुरू करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. - आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ५५ कोटी लाभार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूSenior Citizenज्येष्ठ नागरिक