शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

केंद्र सरकारचा साखर कारखान्यांना मोठा धक्का! आता उसापासून इथेनॉलचे उत्पादन घेता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 5:25 PM

साखर कारखान्यांना आता केंद्र सरकारने मोठा धक्का दिला आहे.

मुंबई- साखर कारखान्यांना आता केंद्र सरकारने मोठा धक्का दिला आहे. या हंगामात साखर कारखान्यांना इथेनॉलचे उत्पादन घेता येणार नाही. याबाबत केंद्र सरकारने एक नोटीफिकेशन जारी केले आहे. या हंगामात ऊसापासून इथनॉल बनवता येणार नाही. या वर्षी भारतीय बाजारपेठेत साखरेची कमतरता भरुन काढण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

'वसुंधरा राजे यांच्या मुलाने आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवले', भाजप आमदाराच्या वडिलांचा आरोप

या वर्षी भारतात मान्सून कमी बरसला आहे. याचा फटका ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामुळे ३१ ऑक्टोंबरपर्यंत भारत सरकारने साखर एक्सपोर्टवरही बंदी घातली होती. इथेनॉल बंदीमुळे भारतात साखरेचे उत्पादन वाढू शकते. यामुळे साखरेचा मुबलक साठा होईल. जर इथेनॉल बनवणे कायम ठेवले असते तर साखरेचे उत्पादन कमी झाले असते म्हणून हा निर्णय घेतला आहे. 

या वर्षी देशभरात पाऊस कमी पडला असल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी लागते, त्यामुळे या वर्षी कमी पाण्यामुळे कमी ऊस शेती केली आहे. यामुळे साखरेचा तुटवडा पडणार आहे. त्यामुळे ऊसाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने कारखान्यांना नोटीफिकेशन काढत मोठा झटका दिला आहे. 

या नोटीफिकेशनमध्ये साखर कारखान्यांनी इथेनॉलचे उत्पादन न घेता फक्त साखरेचे उत्पादन घेण्याची सूचना दिली आहे. ५ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्रीव अमित शाह यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती, या बैठकीत महागाईबाबत चर्चा झाली. या बैठकीतच इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला होता यावर चर्चा झाल्यानंतर आता सरकारने कारखान्यांसाठी ही नोटीफिकेशन जारी केली आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAmit Shahअमित शाह