शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

केंद्र सरकारने भाजपच्या 32 नेत्यांची सुरक्षा काढली; ...म्हणून अमित शाह यांनी घेतला हा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 18:59 IST

यात गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या काही भाजप नेत्यांच्या नावाचाही समावेश होता...

केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी (२६ फेब्रुवारी २०२५) पश्चिम बंगालमधील एकूण ३२ भाजप नेत्यांची सुरक्षा काढून घेतली. खरे तर, गृह मंत्रालयाच्या समीक्षा समितीने यासंदर्भात एक यादी जाहीर केली होती, यात गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या काही भाजप नेत्यांच्या नावाचाही समावेश होता. 

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, माजी केंद्रीय मंत्री जॉन बारला, माजी खासदार दशरथ तिर्की, बीजेपी नेते शंकुदेव पांडा आणि माजी आयपीएस अधिकारी देबाशीष धर आदीनेत्यांचा सुरक्षा हटवण्यात आलेल्या ३२ नेत्यांमध्ये समावेश आहे. महत्वाचे महणजे, तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार अभिषेक बनर्जी यांच्याकडून पराभूत झालेले डायमंड हार्बर भागातील उमेदवार अभिजीत दास, डायमंड हार्बरचे माजी आमदार दीपक हलदर, बोलपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार पिया साहा आणि जंगीपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार धनंजय घोष आंदींचाही या यादीत समावे आहे.

काय म्हणाले अभिजीत दास? -अभिजित दास म्हणाले, "मी हरिद्वारमध्ये आहे, यासंदर्भात मला कसलीही माहिती नाही. यासंदर्भात आपल्याकडे अद्याप कोणताही मेसेज आलेला नाही. खरे तर, ही एक नियमित प्रक्रिया आहे. केंद्रीय गृहमंत्रालय दर तीन महिन्याला अशा प्रकारची यादी  जारी करत असते. त्यांचा एक प्रोटोकॉल आहे. ते पुन्हा सुरक्षा प्रदान करत असतात. गेल्या साडे सहा वर्षांत मी हे अनेक वेळा बघितले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी २० जणांच्या नावांची अशी एक यादी आली होती. यानंतर पुन्हा अनेकांना सुरक्षा देण्यात आली."

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना भाजप खासदार तथा राज्य प्रवक्ते समिक भट्टाचार्य इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना म्हणाले, "ही एक नियमित प्रक्रिया आहे. सुरक्षिततेची आवश्यकता कुणाला आणि केव्हा आहे, हे केंद्र ठरवते आणि त्यानुसार सुरक्षा पुरवली जाते. यासंदर्भात राजकारण करण्यासारखे काहीही नाही. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल