शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, "कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार, परंतु..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 13:16 IST

Farmers Protest : कृषी मंत्र्यांनी साधला विरोधकांवर निशाणा, शनिवारी शेतकरी आंदोलनाला पूर्ण झाले १०० दिवस

ठळक मुद्देकृषी मंत्र्यांनी साधला विरोधकांवर निशाणाशनिवारी शेतकरी आंदोलनाला पूर्ण झाले १०० दिवस

गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या असून यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. शनिवारी पुन्हा एकदा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायद्यांवर टीका करणाऱ्या विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. "जे लोकं याचा विरोध करत आहेत ते याबाबत अधिक माहिती मिळवत नाहीयेत असं दिसतंय. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. आम्ही कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार आहोत. परंतु कृषी कायद्यांमध्ये काही त्रुटी आहेत असं विरोधकांनी म्हणून नये. कारण कृषी कायद्यांमध्ये काय त्रुटी आहेत हे सकारात्मकरित्या सांगण्याच्या स्थितीत विरोधक नाहीत," असं म्हणत तोमर यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असल्या तरी त्यावर सकारात्मक तोडगा निघालेला नाही. या चर्चांमध्ये सरकारचं नेतृत्व कृषीमंत्री तोमर यांनीच केलं होतं. शनिवारी या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्तानं दिल्लीनजीकचा प्रमुख रस्ता बंद ठेवण्यात आला होता. "चर्चेदरम्यान कायद्यांमध्य काही सुधारणांबाबत वक्तव्य केलं. परंतु या सुधारणांचा अर्थ या कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत असा नाही. या कायद्यात सुधारणांचा प्रस्ताव यासाठी ठेवला जात आहे कारण याच्या विरोधात नेतृत्व करणारा प्रमुख चेहरा शेतकऱ्यांचा आहे," असं तोमर म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांनाही धारेवर धरत त्यांच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केला. "संसदेतही आम्ही आमचं मत सर्वांच्या समोर ठेवलं. अनेक तास आम्ही दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांची बाजू ऐकली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतरही विरोधीपक्ष नेत्यांनी आंदोलनावरच चर्चा केली. कायद्याबाबत चर्चाच केली नाही," असं त्यांनी नमूद केलं. केवळ आंदोलनाबाबतच चर्चा"विरोधी पक्षाचे नेते प्रत्येक वेळी केवळ आंदोलनावरच चर्चा केली. कृषी कायद्यांबाबत त्यांनी कोणतीही चर्चा कली नाही, ज्याचा शेतकरी विरोध करत आहेत. लोकशाहीत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण राजकारण करण्यासाठी स्वतंत्र आहे. परंतु शेतकऱ्यांचं हित आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवून राजकारण करु नये. जेव्हा कोणताही बदल येतो तेव्हा तो लागू करणं कठिण आहे. काही लोकं त्याचा विरोध करतात. काही लोकांकडून त्याची मजाही केली जाते. जर त्या बदलांमागे उद्देश चांगला असेल तर लोकं तो स्वीकारही करतात," असं तोमर यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Narendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरFarmers Protestशेतकरी आंदोलनcongressकाँग्रेसBJPभाजपाParliamentसंसदdelhiदिल्ली