शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पूरस्थितीत वापरलेल्या हेलिकॉप्टरचे पैसे द्या, केंद्राकडून केरळ सरकारला 102 कोटींचं बिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 16:19 IST

भारतीय सैन्य दलातील हेलिकॉप्टरचा वापर केरळमधील पूरस्थितीवेळी करण्यात आला होता.

नवी दिल्ली - केंद्र सरकारनेकेरळ सरकारला 102 कोटी रुपयांचे बिल पाठवले आहे. विशेष म्हणजे केरळमधील पूरस्थितीवेळी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जी मदत करण्यात आली होती, त्या हेलिकॉप्टरच्या वापरांचे हे बिल असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. सध्या केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा मोदी-ममता वाद देशभर चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच, केरळ सरकारला पाठविण्यात आलेले हे बिल पाहूनही अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. 

भारतीय सैन्य दलातील हेलिकॉप्टरचा वापर केरळमधील पूरस्थितीवेळी करण्यात आला होता. नागरिकांना वाचविण्यासाठी, अन्नधान्य पूरविण्यासाठी, केरळच्या मदतीसाठी सैन्याचे जवान आकाश-पाताळ एक करुन केरळवासीयांच्या मदतीला धावले होते. त्यावेळी वायू दलानेही मोठी कामगिरी बजावली होती. मात्र, वायूदलाच्या या धाडसी कामगिरीची किंमत केंद्र सरकारने केरळ सरकारला मागितली आहे. केंद्र सरकारने केरळ सरकारला 102 कोटी रुपयांचे बिल जारी केले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील पूरस्थितीवेळी वापरात आणलेल्या हेलिकॉप्टरचे हे बिल असल्याची माहिती सोमवारी राज्यसभेत देण्यात आली.

केरळमधील पूरस्थितीवेळी भारतीय वायू दलाच्या हेलिकॉप्टरने तब्बल 517 फेऱ्या केल्या. त्यामध्ये 3787 नागरिकांचा जीव वाचवला असून 1350 टन वजनाच साहित्याची देवाण-घेवाण केली आहे. तर, दुसऱ्या 634 फेऱ्यांमध्ये 584 लोकांना सुरक्षितस्थळी हलवले असून 247 टन सामानाची वाहतूक केली आहे. त्यामुळेच, 102.6 कोटी रुपयांचे बिल केरळमधील राज्य सरकारला पाठविण्यात आल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली. याबाबत वायू दलाकडून संपूर्ण तपशील घेण्यात आल्याचे भामरे यांनी सांगितले. दरम्यान, केरळ सरकारकडून हे बिल केंद्रीय गृह विभागाला पाठविण्यात आले असून या बिलाची तपशीलवार माहिती घेण्याचं सूचवलं आहे.  

टॅग्स :KeralaकेरळKerala Floodsकेरळ पूरindian navyभारतीय नौदलHelicopter Eelaहेलिकॉप्टर ईलाCentral Governmentकेंद्र सरकार