शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Chandipura Virus : सावधान! कोरोनापेक्षाही धोकादायक आहे चांदीपुरा व्हायरस?; WHO ने दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 14:06 IST

Chandipura Virus : चांदीपुरा व्हायरस भारतातील अनेक राज्यांमध्ये वेगाने पसरत आहे. आता त्याचा मृत्यूदर ३३ टक्क्यांवर पोहोचला आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे

चांदीपुरा व्हायरस भारतातील अनेक राज्यांमध्ये वेगाने पसरत आहे. आता त्याचा मृत्यूदर ३३ टक्क्यांवर पोहोचला आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. गेल्या २० वर्षांत भारतात हा धोकादायक आजार झपाट्याने वाढल्याचं WHO ने मान्य केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आत्तापर्यंत चांदीपुरा व्हायरलची २४५ प्रकरणं भारतात नोंदवली गेली आहेत. गेल्या २० वर्षांतील हा उच्चांक आहे.

'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'नुसार, जूनच्या सुरुवातीपासून ते १५ ऑगस्टपर्यंत ८२ मृत्यू झाले आहेत. चांदीपुरा व्हायरसचा पुढील प्रसार रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने वेक्टर नियंत्रण आणि माश्या, डास आणि टिक्स यांच्यापासून बचाव करण्याची शिफारस केली आहे. १५ ऑगस्ट दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने AES (एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम) ची २४५ प्रकरणं नोंदवली. ज्यामध्ये ८२ मृत्यूंचा समावेश आहे. ६४ प्रकरणं चांदीपुरा व्हायरसची आहेत. 

WHO ने दिला इशारा 

WHO ने म्हटलं आहे की,  चांदीपुरातील व्हायरस आधीच कमी होत आहेत. मात्र याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. कारण पाऊस पडल्यानंतर डास आणि माशांमुळे रोगराईचा धोका वाढतो. कारण त्यामुळे त्याचा प्रसार झपाट्याने होतो. बाधित लोकांचे नमुने घेतले जातात. या आजाराची वेळीच ओळख झाली तर मृतांची संख्या कमी होऊ शकते.

चांदीपुरा व्हायरसची लक्षणं

चांदीपुरा व्हायरसची लागण झालेल्या मुलांना अचानक जास्त ताप, उलट्या, जुलाब, चक्कर येणे, डोकेदुखी, मेंदूला सूज येणं यासारखी लक्षणं दिसतात, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. या व्हायरसची लागण झालेली मुलं लक्षणं दिसल्यानंतर ४८-७२ तासांच्या आत मरतात. अशा परिस्थितीत हा व्हायरस लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी घातक मानला जातो. 

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना