शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
7
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
8
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
9
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
10
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
11
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
12
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
13
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
14
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
15
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
16
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
17
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
18
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
19
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
20
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 

जगनमोहनच्या ‘वादळात’ चंद्राबाबूंची नौका बुडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 04:00 IST

आंध्रप्रदेशातील १३ जिल्ह्यात हजारो किलोमीटर पदयात्रा करीत लोकांमध्ये स्थान निर्माण केलेल्या जगनमोहन रेड्डी यांनी लोकसभेबरोबरच विधानसभेत आपले वर्चस्व निर्माण केले.

- समीर इनामदार अमरावती : आंध्रप्रदेशातील १३ जिल्ह्यात हजारो किलोमीटर पदयात्रा करीत लोकांमध्ये स्थान निर्माण केलेल्या जगनमोहन रेड्डी यांनी लोकसभेबरोबरच विधानसभेत आपले वर्चस्व निर्माण केले. वडील आणि माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्यानंतर मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरत आहे. वायएसआर काँग्रेसने निर्माण केलेल्या वादळात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची नौका बुडाली.युवाजन श्रमिक रयतू काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत २५ पैकी २३ जागांवर विजय मिळविला तर विधानसभेच्या १७५ जागांपैकी १५१ जागा जिंकल्या. एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला २३ तर जनसेना पक्षाला केवळ एक जागा मिळू शकली. लोकसभेच्या २५ जागांपैकी तेलुगू देसम पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या.२०१३ ते २०१७ पर्यंत तेलुगू देसम पक्ष आणि एनडीए यांची युती होती. चंद्राबाबू नायडू गेल्या अनेक वर्षांपासून आंध्रसाठी विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणून मागणी करीत होते. केंद्राने ही मागणी फेटाळल्यानंतर नायडू यांनी एनडीएपासून फारकत घेतली. केंद्रातील मंत्र्यांनी राजीनामे दिले; मात्र निवडणुकीत याचा तेलुगू देसमला फटका बसला.जगनमोहन यांच्या प्रचारात प्रशांत किशोर यांची मोठी भूमिका होती. त्याशिवाय अभिनेता पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षामुळे तेलुगू देसम पक्षाला नुकसान सहन करावे लागले. वायएसआर काँग्रेसने आदिवासी, मागासवर्गीय, मुस्लीम यांची मोट बांधली. त्याचा फायदा जगनमोहन यांना मिळाला. कापू समाज जगनमोहन यांच्यासमवेत राहिला. रायलसीमाच्या ५२ पैकी ५० जागांवर तेलुगू देसमला पराभव पत्करावा लागला. वायएसआर काँग्रेसने ४९.९ टक्के मते मिळविली. तेलुगू देसम पक्षाला ३९.२ टक्के मते मिळाली.या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला खातेही उघडता आले नाही. मुख्य लढाई तेलुगू देसम पार्टी आणि वायएसआर काँग्रेस यांच्यातच झाली. विशेष म्हणजे काँग्रेस आणि भाजपला नोटापेक्षाही कमी मते मिळाली.जगनमोहन यांच्यासमोर आता नव्याने स्थापन झालेल्या आंध्रप्रदेश राज्याच्या प्रगतीचे मोठे आव्हान समोर आहे. सध्या आंध्रप्रदेशसमोर २.५८ लाख कोटींचे कर्ज आहे. त्याशिवाय आंध्रला विशेष दर्जा देण्यासाठीही त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradesh Assembly Election 2019आंध्रप्रदेश विधानसभा निवडणूक 2019Andhra Pradesh Lok Sabha Election 2019आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक 2019