शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंची टीडीपी भुईसपाट, वायएसआर कॉंग्रेसने लावली वाट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 14:06 IST

आंध्र प्रदेशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कोंग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे

हैदराबाद - लोकसभा निवडणुकीत भाजपाला देशभरात मोठे यश मिळाले आहे. मात्र, दक्षिण भारतात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यात भाजापाने घवघवीत यश मिळाल्याचे दिसून येत आहे. पण, दक्षिणेतील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये भाजपाची चांगलीच गोची झाल्याचे दिसून येत आहे. आंध्र प्रदेशमधील 25 जागांपैकी जवळपास 25 लोकसभा मतदारसंघात वायएसआर कोंग्रेसला मोठे यश मिळाले आहे. सत्तारूढ टीडिपी पक्षाचा मोठा पराभव होत असल्याचे चित्र दिसत आहे. 

आंध्र प्रदेशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कोंग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या टीडिपी पक्षाला धूळ चारत मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे दिसून येते. वायएसआर कोंग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी हा विजय जनता आणि देवाच्या कृपाशीर्वादानेच मिळाल्याचे म्हटले. सध्याच्या आकडेवारीनुसार वायएसआर रेड्डीच्या कोंग्रेस पक्षाला सर्वच 25 जागांवर आघाडी मिळत असल्याचे दिसून येते. तर, चंद्राबाबू यांच्या टिडीपि पक्षाला खातेही खोलता येणार की नाही, अशीच परिस्थिति दिसत आहे. तसेच विधानसभा निवडणूकमध्येही वायएसआर कॉंग्रेसला 150 पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाल्याचे चित्र आहे. दरम्यान,टीडिपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी पराभवाबद्दल निवडणूक आयोगाला दोषी ठरवले असून आजचा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे म्हटले आहे.

 

टॅग्स :Telangana Lok Sabha Election 2019तेलंगाना लोकसभा निवडणूक निकाल 2019TelanganaतेलंगणाChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradesh Assembly Election 2019आंध्रप्रदेश विधानसभा निवडणूक 2019