शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

BRS चे चंद्रशेखर राव कोणासोबत, INDIA की NDA? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 12:14 IST

चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचा विस्तार देशपातळीवर केला असून आपल्या पक्षाचे नावही त्यांनी बदलले आहे.

हैदराबाद - देशातील आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, मोदींच्या नेतृत्त्वातील भाजपला यंदाही यश मिळेल असा सर्व्हे काही माध्यमांच्या ओपिनियन पोलमध्ये दिसून आला. तर, भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्रित येण्याची हाक दिली आहे. त्यानुसार, २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया नावाने आघाडी स्थापन केली आहे. दुसरीकडे भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएमध्ये ३८ पक्षांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत रंगत येणार असल्याचे दिसून येते. आता, भारतीय राष्ट्र समितीच्या प्रमुखांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांनी भूमिका स्पष्ट केली.   

चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचा विस्तार देशपातळीवर केला असून आपल्या पक्षाचे नावही त्यांनी बदलले आहे. भारतीय राष्ट्र समिती नावाने त्यांनी आपला पक्ष देशभरात पोहोचवण्याची मोहिम हाती घेतली असून नकुतेच महाराष्ट्रातही त्यांची मोठी सभा झाली. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंढरपुरात सभा घेतली. यावेळी, माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यावेळी, भाषण करताना राव यांनी आपण कुठल्याही पक्षाची ना ए टीम आहोत, ना बी टीम आहोत. आपण, केवळ शेतकऱ्यांची टीम असल्याचं म्हटलं होतं. आता, देशातील दोन आघाड्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. 

तुम्ही कोणत्या आघाडीत आहात, इंडिया की, एनडीए? असा प्रश्न बीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव यांना विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना राव यांनी आपण कुठल्याही आघाडीत नाही, आपण स्वंतत्र पक्ष आहोत, असे स्पष्ट केले. तसेच, आपल्यासोबतही अनेक मित्रपक्ष असल्याचं त्यांनी म्हटलं. तर, नवीन भारत घडवणार बोलणाऱ्या इंडिया आघाडीवरही टीका केली. नवा भारत काय आहे? ज्यांच्याहाती गेल्या ५० वर्षांपासून भारत होता. तेव्हा काहीही बदललं नाही, असे म्हणत इंडिया आघाडीवर राव यांनी टीका केली. 

दरम्यान, भाजपने मोदींच्या नेतृत्त्वात पुन्हा एकदा देशात सत्ता स्थापन करण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी, मोदी@9 अभियानही सुरू करण्यात आलं असून गेल्या ९ वर्षात मोदींच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या जनकल्याणकारी निर्णयांची माहिती, योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. त्याद्वारे पुन्हा एकदा मोदींनाच पंतप्रधानपदी बसवण्याचं स्वप्न भाजपने बाळगलं असून त्यासाठी प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावhyderabad-pcहैदराबादBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती