शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवर एवढा पाऊस का कोसळला? जे सिंधुदूर्ग, रत्नागिरीत घडले, तेच... हवामान विभागाने कारण सांगितले
2
'वरुण' पाऊस कोसळतोय, दुपारी समुद्राला भरती; पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईचे तळे होणार?
3
कांदा, दूध दरवाढीचे खासदार निलेश लंके यांचे आंदोलन स्थगित
4
एकच साप सहावेळा चावला, पिछा सोडविण्यासाठी तरुण मावशीकडून काकाकडे गेला, तिथेही...
5
मंत्री अन् आमदारांना पावसाचा फटका; अनिल पाटील, अमोल मिटकरींचा रेल्वे ट्रॅक वरून पायी प्रवास
6
“तुम्ही कसे निवडून येत नाही ते बघतो, इथली निवडणूक आपण जिंकू”; शरद पवारांचा कुणाला शब्द?
7
'आयुष्मान कार्ड' धारकांसाठी महत्त्वाची बातमी; १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता
8
रायगडावर पर्यटनासाठी जायचा प्लॅन असेल तर थांबा! जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
9
Mumbai Weather Forecast: मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार; असा आहे हवामान खात्याचा अंदाज
10
Jagannath Yatra: पुरीच्या जगन्नाथाला एकादशीच्या दिवशीसुद्धा भाताचा नैवेद्य चालतो; वाचा त्यामागील कथा!
11
Vishal Pandey : बिग बॉसमध्ये विशालला मारहाण; आईला आलं रडू, बाबांनी जोडले हात, म्हणाले, "माझा मुलगा..."
12
Karan Johar Kids: आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो? मुलांच्या प्रश्नांमुळे करण जोहर हैराण; म्हणाला...
13
इंडोनेशियातील सोन्याच्या खाणीत भूस्खलन; १२ जणांचा मृत्यू, १८ बेपत्ता
14
Russia Ukraine War : भीषण! रशियाने युक्रेनवर डागले रॉकेट; ५० हून अधिक हवाई हल्ले, ११ जणांचा मृत्यू, ४० जण जखमी
15
अंगारकी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा गणपती बाप्पाचे विशेष पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Hathras Stampede : "१०-१२ लोक विषारी स्प्रे घेऊन..."; भोले बाबांच्या वकिलाचा दावा, हाथरस चेंगराचेंगरीची नवी थिअरी
17
रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये तुफान वाढ, ५०० पार गेला भाव; १ लाखांचे झाले ४४ लाख रुपये
18
बेपत्ता होऊन घरवापसी झालेला 'सोढी' पहिल्यांदाच मीडियासमोर, म्हणाला- "माझा फोन बंद त्यामुळे.."
19
साखर-मीठ किती आहे? कंपन्यांना पॅकेटवरच द्यावी लागणार माहिती, मोठ्या अक्षरात लिहिणं बंधनकारक
20
Assam Flood : पावसाचा हाहाकार! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; ७८ जणांचा मृत्यू, पूरग्रस्तांना भेटणार राहुल गांधी

तेलंगणामध्ये काँग्रेसकडून चंद्रशेखर राव यांच्या BRSला सुरुंग, खासदारानंतर ६ आमदारही फोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 2:10 PM

Telangana Political Update: झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीआरएसला (BRS) राज्यात एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने (Congress) बीआरएसला खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, बीआरएसच्या सहा विधान परिषदेतील आमदारांनी नुकताच पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

तेलंगणामध्ये गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा अनपेक्षित आणि धक्कादायक पराभव झाला होता. तेव्हापासून त्यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणावर गळती लागली असून, अनेक नेते आणि लोकप्रतिनिधी पक्ष सोडत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीआरएसला राज्यात एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने बीआरएसला खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, बीआरएसच्या सहा विधान परिषदेतील आमदारांनी नुकताच पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

बीआरएसच्या या सहा आमदारांना गुरुवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या आमदारांना काँग्रेसचं सदस्यत्व बहाल केलं. के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये आलेल्या सहा आमदारांमध्ये दांडे विठ्ठल, भानू प्रसाद राव, एम. एस. प्रभाकर, बोग्गरापू दयानंद, येग्गे मल्लेशम आणि बसवराजू सरैया यांचा समावेश आहे.

काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी बीआरएसचे आमदार मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या निवासस्थानी आले तेव्हा काँग्रेसच्या तेलंगणाच्या प्रभारी दीपा दासमुंशी आणि इतर नेते उपस्थित होते. दरम्यान, मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर बीआरएसचे सहा आमदार काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. तसेच आणखी काही आमदार सत्ताधारी पक्षात दाखल होऊ शकतात.

दोन दिवसांपूर्वीही बीआरएसला मोठा धक्का बसला होता. तेव्हा बीआरएसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार के. केशव राव काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी तसेच रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.  

टॅग्स :Telanganaतेलंगणाcongressकाँग्रेसBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती