शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

पुस्तकातून काढला ‘आरटीआय’चा धडा

By admin | Published: May 19, 2016 4:31 AM

राजस्थान सरकारने, आता शालेय अभ्यासक्रमातील माहितीचा अधिकार कायद्याशी (आरटीआय) संबंधित धडाही काढून टाकला आहे.

जयपूर: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह स्वातंत्र्य संग्रामातील काही नेत्यांची माहिती पाठ्यपुस्तकातून हटविण्याचा निर्णय घेणाऱ्या राजस्थान सरकारने, आता शालेय अभ्यासक्रमातील माहितीचा अधिकार कायद्याशी (आरटीआय) संबंधित धडाही काढून टाकला आहे.इयत्ता आठवीच्या समाजविज्ञानाच्या पुस्तकात बाराव्या धड्यात पृष्ठ क्रमांक १०५ वर आरटीआय आणि लोकांना असलेला त्याचा फायदा, यावर आधारित माहिती देण्यात आली होती, पण सरकारने ती काढून टाकली आहे. शेतमजूर संघटनेच्या नेत्या अरुणा राय आणि निखिल डे यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला असून, पाठ्यपुस्तकात बदल न करण्याचे आवाहन केले आहे. अरुणा राय म्हणाल्या की, ‘देशात आणि साऱ्या जगात माहिती अधिकार कायद्याची लोकप्रियता वाढते आहे. सरकारतर्फे माहितीच्या अधिकारासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. अशात राज्य सरकारने असा निर्णय घेणे राजस्थानसाठी आत्मघाती ठरेल.’ काँग्रेसने राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करताना मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना पारदर्शिकतेशी काही देणेघेणे नाही, हे यावरून स्पष्ट होत असल्याची टीका केली आहे. भाजपाने काँग्रेस व एमकेएसएसच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना एखादा धडा पाठ्यक्रमातून काढून टाकण्यात आला असल्यास पुढील सत्रात तो पुन्हा समाविष्ट केला जाईल, अशी ग्वाही दिली. (वृत्तसंस्था)