शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

बिहार पॅकेजवरून आरोप-प्रत्यारोप

By admin | Published: August 20, 2015 11:25 PM

जुन्याच योजनांना नवा साज चढवत देण्यात आलेले १.२५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज हा निवडणूक जुमला असल्याचा आरोप होत असतानाच केंद्र सरकारने त्यासाठी

नवी दिल्ली : जुन्याच योजनांना नवा साज चढवत देण्यात आलेले १.२५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज हा निवडणूक जुमला असल्याचा आरोप होत असतानाच केंद्र सरकारने त्यासाठी अतिरिक्त तरतूद करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या पॅकेजअंतर्गत प्रत्येक योजना नवी राहणार आहे. सुरू न झालेली कामे हाती घेण्यासाठी निधीचा वापर केला जाईल. केंद्राकडून सर्वसाधारण मदतीचा ओघ सुरूच राहणार असून त्याशिवाय दिला गेलेला हा वेगळी निधी असेल, असा खुलासाही केला आहे. बिहारच्या पॅकेजवरून नितीशकुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संयुक्तरीत्या हल्ला चढविल्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर यांनी मदत पॅकेजचे राजकारण केले जाऊ नये, असा इशारा दिला.मोदींनी बिहारसाठी पॅकेजची घोषणा केली असली तरी त्यासाठी कोणतीही अर्थसंकल्पीय तरतूद केली नसून हा पैसा कुठून दिला जाणार तेसुद्धा स्पष्ट करण्यात आलेले नाही, या विसंगतीकडे विरोधकांनी लक्ष वेधले असता उच्चपदस्थ सूत्रांनी येत्या काही वर्षात पॅकेजअंतर्गत समाविष्ट योजनांना अर्थसंकल्पात स्थान दिले जाणार असल्याचे नमूद केले. एवढे मोठे पॅकेज देण्यात आल्यामुळे तुटीचा बोजा वाढणार असल्याची भीतीही सूत्रांनी निरर्थक ठरवली आहे. प्रस्तावित खर्च हा भांडवली खर्चाचा भाग असेल. त्यामुळे उत्पादकता वाढीस लागून बदल्यात उच्च विकास दर लाभेल. नव्या योजना सुरू करण्यांसह अद्याप सुरू न करण्यात आलेली कामे संपविण्यासाठी हा निधी उपयोगात आणला जाईल, असेही सूत्रांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)