शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या वेळी एकनिष्ठ राहिले, उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? मातोश्री गाठली
2
महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 
3
"नव्या जोडप्यांनी 16-16 मुलं जन्माला घालावीत, कारण..."; CM चंद्रबाबूंनंतर, आता स्टॅलिन यांचंही अजब आवाहन
4
Gold Silver Price Today : सोन्याचे दर गगनाला भिडले; चांदी एकाच दिवसात ४८८४ रुपयांनी महागली
5
पहिल्या यादीत नाव नाही, पक्षाला रामराम ठोकत भाजपाचा हा नेता थेट जरांगेंच्या भेटीला
6
तोंडावर मास्क अन् गुंडांना लोळवणारा पोलीस! KGF च्या मेकर्सचा नवा सिनेमा 'बघिरा', उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज
7
उघडताच १००% सबस्क्राइब झाला IPO, किरकोळ गुंतवणूकदारांच्या उड्या; किती आहे GMP?
8
ठाकरे गटात अन् काँग्रेसमध्ये किती जागांसाठी वाद? ‘मविआ’तील नेत्याने सगळेच सांगितले
9
Astro Tips: फक्त २ लवंगा करतील तुमच्या अडचणी दूर; सोमवारी न चुकता करा 'हा' उपाय!
10
Vastu Shastra: 'या' टिप्स फॉलो केल्या तर दिवाळीतच काय, वर्षभर चमकेल तुमची वास्तु!
11
काँग्रेस पोटनिवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा एकटी लढण्याची शक्यता
12
चंद्राबाबूंनी जोडप्यांना दिला अधिकाधिक मुलं जन्माला घालण्याचा सल्ला, नवीन कायदाही आणणार, नेमकं कारण काय?
13
Ola नं सर्व्हिस सेंटरवर उभे केले बाउन्सर्स? कुणाल कामरानं पुन्हा भाविश अग्रवालांवर यांच्यावर साधला निशाणा
14
हिरवा चुडा अन् हातात हळकुंड! शोभिताला लागणार नागा चैतन्यच्या नावाची हळद, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात
15
Karan Johar Dharma Production : करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'ला मिळणार अदर पूनावालांचा 'बूस्टर', विकत घेणार अर्धा हिस्सा
16
मदरसे बंद करण्याची NCPCR ची शिफारस; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
17
ICU मध्ये प्रवेश न दिल्याने भाजपा आमदाराच्या भावाची दादागिरी; कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
परी म्हणू की सुंदरा... तिच्या जबरदस्त खेळाने प्रतिस्पर्धी, तर सौंदर्याने चाहते घायाळ
19
“कोणताही विभाग हा एका पक्षाचा नसतो”; ठाकरे गट-काँग्रेस वादावर संजय राऊत स्पष्टच बोलले
20
मी मरता मरता वाचलो! मराठी अभिनेत्याने सांगितला घोडबंदर रस्त्यावरील जीवघेणा प्रसंग, राजकारण्यांना लगावला टोला

मोदी सरकार सैनिकांप्रती गंभीर नसल्याचा शहीदाच्या वडिलांचा आरोप

By admin | Published: June 01, 2015 5:25 PM

देशासाठी प्राणाची आहूती देणा-या सैनिकांप्रती काँग्रेस सरकारप्रमाणेच मोदी सरकार सुध्दा गंभीर नसल्याचा आरोप शहीद कॅप्टन सौरभ कालियाचे वडील डॉ. एन.के. कालिया यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. १ - देशासाठी प्राणाची आहूती देणा-या सैनिकांप्रती काँग्रेस सरकारप्रमाणेच मोदी सरकार सुध्दा गंभीर नसल्याचा आरोप शहीद कॅप्टन सौरभ कालियाचे वडील डॉ. एन.के. कालिया यांनी केला आहे. कारगील युध्दातील शहीदांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालविण्यास केंद्रातील मोदी सरकारने नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या कालिया यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस सरकारपेक्षा भाजप सरकार जास्त देशभक्त असेल अशी आम्हाला आशा होती. पण देशातील सत्ता बदलानंतरही मोदी सरकारचा दृष्टिकोन तसाच असून हे आमच्यासाठी दुर्दैव आहे अशी खंत एन.के. कालिया यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवली.पाकिस्तानविरोधात भारताची कोणतीही ठोस रणनीती नसून कधी आपण पाकिस्तानशी क्रिकेट सामने खेळतो, चर्चा करतो तर कधी लढाई करतो. सत्तेत आल्यानंतर सर्व राजकीय पक्षांचा सूर मात्र एकसारखाच पाहायला मिळतो, असा आरोप डॉ. कालिया यांनी मोदी सरकारवर केला. सीमेवर लढणा-या सैनिकांचे प्रश्न हाताळण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसने आता भाजप सरकारवर टीका सुरू केली आहे. दरम्यान, भाजपने शहीदांचा अपमान केला आहे', असा आरोप काँग्रेस नेते पी.एल. पुनीया यांनी केला आहे. कारगिल युद्धात ४ रेजिमेंटचे कॅप्टन सौरभ कालिया आणि इतर पाच सैनिक अर्जून राम, भंवर लाल बागडिया, भिक्खा राम, मुलाराम आणि नरेश सिंह हे १६ मे १९९९ रोजी कारगिलच्या काकसर सब-सेक्टरमध्ये बेपत्ता झाले होते. त्यानंतर पुढच्या महिन्यात ९ जूनला पाकिस्तानने त्यांचे मृतदेह भारताच्या हवाली केले होते. पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असताना झालेल्या क्रूर मारहाणीत कॅप्टन सौरभ कालियासह हे पाचही जवान शहीद झाले होते. अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेत त्यांचे मृतदेह पाकने भारताला सोपवले होते. याप्रकरणी शहीद कालियाच्या कुटुंबीयांनी सुप्रीम कोर्टात याचिका करत हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात नेण्याची मागणी केली होती. दरम्यान, याप्रकरणी २५ तारखेला होणाऱ्या पुढील सुनावणीत केंद्र सरकार आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.