शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

सरन्यायाधीशांवरील आरोप; न्या. पटनाईक करणार ‘कारस्थाना’ची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 02:48 IST

सरन्यायाधीशांवरील आरोपांच्या चौकशीसाठी न्यायालयाने प्रशासकीय पातळीवर न्यायाधीशांची जी समिती नेमली आहे, त्याचा न्या. पटनाईक करणार असलेल्या चौकशीशी काहीही संबंध असणार नाही

नवी दिल्ली : अ‍ॅड. उत्सवसिंग बैन्स यांनी केलेल्या ‘व्यापक कारस्थाना’च्या दाव्यात कितपत तथ्य आहे व असेल तर त्याचे नेमके स्वरूप काय आहे, त्यात नेमके कोण गुंतलेले आहे, याचा तपास करण्यासाठी या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निवृत्त न्यायाधीश न्या. ए. के. पटनाईक यांची नेमणूक केली.त्यांनी हा तपास प्रामुख्याने अ‍ॅड. बैन्स यांनी पुरावे म्हणून सादर केलेल्या माहितीच्या आधारे करायची आहे. अ‍ॅड. बैन्स यांना गोपनीयतेच्या कारणाने काहीही हातचे राखून ठेवता येणार नाही आणि असलेली सर्व माहिती त्यांना या चौकशीत उघड करावीच लागेल, असे खंडपीठाने नमूद केले. केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय), इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) व दिल्ली पोलीस यांनी या चौकशीत न्या. पटनाईक यांना लागेल, तेव्हा व लागेल तशी सर्व मदत करावी, असाही आदेश दिला गेला.

सरन्यायाधीशांवरील आरोपांच्या चौकशीसाठी न्यायालयाने प्रशासकीय पातळीवर न्यायाधीशांची जी समिती नेमली आहे, त्याचा न्या. पटनाईक करणार असलेल्या चौकशीशी काहीही संबंध असणार नाही व त्यांचा परस्परांवर काही परिणामही होणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. चौकशीसाठी न्या. पटनाईक यांना मुदत ठरवून दिलेली नाही. चौकशी पूर्ण झाल्यावर त्यांनी सीलबंद लखोट्यात अहवाल द्यायचा आहे. तो आल्यावर पुढे काय करायचे ते हे विशेष खंडपीठ ठरवेल.

न्या. रमणा यांच्याऐवजी न्या. मल्होत्रा समितीवरसरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्यावरील आरोपांच्या ‘इन हाऊस’ चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या तीन न्यायाधीशांच्या समितीमधून न्या. एन. व्ही. रमणा गुरुवारी बाहेर पडल्यानंतर लगेचच त्यांच्याजागी न्या. इंदू मल्होत्रा यांना समितीवर नेमण्यात आले. तक्रारदार महिलेने न्या. रमणा यांनी समितीवर असण्यास आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी समितीचे अध्यक्ष न्या. शरद बोबडे यांना पत्र लिहून आपण समितीतून बाहेर पडत असल्याचे कळविले. असे समजते की, या तीन पानी पत्रात न्या. रमणा यांनी तक्रारदार महिलेल्या आक्षपामुळे नव्हे तर चौकशी कोणत्याही प्रकारे कलुषित होऊ नये म्हणून नकार देत असल्याचे स्पष्ट केले आहे. न्या. मल्होत्रा यांच्या नेमणुकीने आतात्या व न्या. इंदिरा बॅनर्जी असे दोन महिला सदस्य होतील. त्यामुळे समितीवर बहुसंख्य सदस्य महिला असावेत, ही तक्रारदार महिलेची मागणीही पूर्ण होईल. आपल्याला वकील घेऊ देण्याची त्या महिलेची मागणी मात्र समितीने मान्य केली नसल्याचे कळते. आधी ठरल्याप्राणे समितीचे काम उद्या शुक्रवारपासून सुरु व्हायचे आहे. सर्वोच्च न्यायालयात महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या असभ्य वर्तनाच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी न्या. मल्होत्रा यांच्याच अध्यक्षतेखाली एक स्थायी समिती आधीपासून आहे. मात्र त्या समितीस न्यायाधीशांविरुद्धच्या तक्रारींची चौकशी करण्याचे अधिकार नसल्याने न्यायाधीशांची ही विशेष समिती नेमण्यात आली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRanjan Gogoiरंजन गोगोई