शहरं
Join us  
Trending Stories
1
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
2
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी
3
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
4
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
5
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
6
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
7
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
8
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
9
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
10
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
11
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
12
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
13
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
14
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
16
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
17
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल विविध कामांचा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 5:49 AM

मोदी सरकारची नऊ वर्षे पूर्ण होण्याची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सरकारच्या १०० मोठ्या कामांवर एक पुस्तिकाही तयार करण्यात आली आहे.

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असून, अयोध्येतील राम मंदिर, कलम ३७०, तीन तलाक, सर्जिकल स्ट्राईकपासून ते कोरोना लसीपर्यंत मोदी सरकारच्या कामांचा देशभरात जयघोष करण्याची तयारी सुरू झाली आहे. देशातील सर्व जिल्ह्यांत मोदी सरकारच्या कामांवर तयार केलेली पुस्तिका पाठविली जाईल व प्रत्येक जिल्ह्यात याबाबत एक पत्रकार परिषदही घेण्यात येईल.

मोदी सरकारची नऊ वर्षे पूर्ण होण्याची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सरकारच्या १०० मोठ्या कामांवर एक पुस्तिकाही तयार करण्यात आली आहे. २५, २६ मे रोजी या पुस्तिकेवर माध्यमांना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखविण्यात येणार आहे. नऊ वर्षांत भारत किती बदलला आहे, देश कोठून कोठे पोहोचला आहे, जगात भारताची ताकद व मान किती वाढला आहे, हे सर्व यात सांगितले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर २०२४ साठी कोणीही तोडीस तोड नाही, हे दाखविण्यासाठी हा सर्व प्रयत्न आहे. त्याचबरोबर कर्नाटकच्या पराभवाचा भाजप व मोदींना काहीही फरक पडणार नाही, हेही सांगितले जाणार आहे. 

मोदी सरकारचे सर्व मंत्री, भाजपचे सर्व नेते, खासदार जनतेमध्ये जाणार आहेत व ही कामे सांगणार आहेत. मोदी सरकारच्या याच कामांच्या उपलब्धींवर २०२४ मध्ये भाजप निवडणूक लढवणार आहे. देशभरात पत्रकार परिषदा, जनसंवाद, सेमिनार, जाहीर सभा हाेतील. एकूणच ही सर्व तयारी नऊ वर्षांची कामे सांगण्यापेक्षा २०२४ च्या तयारीसाठी असल्याचे जास्त दिसते.

या मुद्द्यांवर लढविणार निवडणूक  मोदी सरकारच्या ज्या मोठ्या कामांवर २०२४ ची निवडणूक लढविली जाणार आहे, त्यात अयोध्येतील राम मंदिर, काश्मीरमधील कलम ३७० हटविणे, पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राईक, कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकणे, कोरोना लस भारतात तयार करणे, ८० कोटी लोकांना मोफत रेशन देणे, १२ कोटी घरांत पिण्याचे पाणी पोहोचविणे, स्वयंपाकाचा गॅस प्रत्येक घरी पोहोचविणे, ५० कोटींपेक्षा जास्त बँक खाती उघडणे, मनरेगाला डीबीटीशी जोडणे, पीक विमा योजनेची व्याप्ती वाढविणे यांसारख्या योजनांचा यात समावेश आहे. मोदी सरकारच्या मंत्रालयाच्या योजना व कामांचाही यात समावेश केला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी