शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 09:47 IST

एअर शोनंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ५ जणांचा मृत्यू झाला, तर २०० हून अधिक लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

तामिळनाडूतील चेन्नई येथील मरीना बीचवर रविवारी एअर शोचं आयोजन केलं होतं, या एअर शोनंतर झालेल्या चेंगराचेंगरी काही जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. याच दरम्यान यामध्ये जीव गमावलेल्या ३४ वर्षीय कार्तिकेयन यांच्या पत्नीने सांगितलं की, मी आणि आमचा २ वर्षाचा मुलगा आम्हीला कार्यक्रमस्थळी ठेवून माझे पती एक किलोमीटर दूर पार्किंगमध्ये पार्क केलेली बाईक घेण्यासाठी गेले, पण ते परत आलेच नाहीत. 

तिरुवोत्रियूर येथील रहिवासी असलेले कार्तिकेयन एका खासगी लॉजिस्टिक कंपनीत एडमिन म्हणून काम करत होते. ते, त्यांची पत्नी आणि नातेवाईकांसह, एअर शो पाहण्यासाठी मरीना बीचवर गेले होते. एअर शोनंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ५ जणांचा मृत्यू झाला, तर २०० हून अधिक लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

कडक उन्हामुळे अनेक जण बेशुद्ध व्हायला लागले. त्यांना रस्त्याच्या दुतर्फा बसवण्यात आले असून कुटुंबीय त्यांना हवा घालत होते. कार्तिकेयनची पत्नी शिवरंजनी यांनी सांगितलं की, "माझे पती पार्किंगमधून त्यांची बाईक घेण्यासाठी गेले होते. फोन लागत नसल्यामुळे माझा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मी दोन तास वाट पाहत राहिले. मी तरीही फोन करत राहिले."

"अचानक ३.१५ वाजता कोणीतरी कॉल घेतला आणि मला सांगितलं की, माझे पती बेशुद्ध झाले आहेत आणि त्वरित घटनास्थळी पोहोचण्यास सांगितलं. मला घटनास्थळी पोहोचायला फक्त दहा मिनिटे लागली. तिथे माझे पती जमिनीवर बेशुद्ध पडलेले मला दिसले. आम्ही त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दोन तासांत त्याच्यासोबत काय झालं मला माहीत नाही. याला जबाबदार कोण?"

यानंतर शिवरंजनी कार्तिकेयन यांचा मृतदेह आणण्यासाठी राजीव गांधी सरकारी रुग्णालयासमोर थांबल्या होत्या, तेव्हा त्यांना 'मृत्यूचं कारण' माहीत नसल्याचं सांगण्यात आलं. मात्र शिवरंजनी यांनी पतीच्या मृत्यूचं कारण कळेपर्यंत मृतदेह घरी नेण्यास नकार दिला, मात्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या एका दूरच्या नातेवाईकाला घेऊन, त्यांची स्वाक्षरी घेऊन मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवल्याचं पाहून त्यांना धक्काच बसला. शिवरंजनी यांनी सांगितलं की, तिथे काय चाललं आहे हे मला माहीत नव्हतं, मी किंवा कार्तिकेयनच्या आईनेही कागदपत्रांवर सही केली नाही. 

टॅग्स :Chennaiचेन्नई