शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

"भारतात EVM..."; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचं इलॉन मस्क यांना उत्तर, स्पष्टच बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:30 IST

मस्क यांनी 15 जून 2024 रोजी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले होते की, ईव्हीएमचा वापर बंद करायला हवा. हे एखाद्या व्यक्तीद्वारे अथवा आर्टीफिशिअल इंटेलिजन्स (एआय)च्या सहाय्याने हॅक केले जाऊ शकते.

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएम हॅक होण्यासंदर्भातील सर्व आरोपांचे निवडणूक आयोगाने खंडन केले आहे. ईव्हीएमसंदर्भात कसल्याही प्रकारची छेडछाड होऊ शकत नाही, असे आयोगाने म्हटले आहे. खरे तर, गेल्या वर्षात झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर, टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक तथा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या इलॉन मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (ईव्हीएम) सुरक्षिततेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते, असे त्यांनी म्हटेले होते.

काय म्हणाले होते मस्क? -मस्क यांनी 15 जून 2024 रोजी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले होते की, ईव्हीएमचा वापर बंद करायला हवा. हे एखाद्या व्यक्तीद्वारे अथवा आर्टीफिशिअल इंटेलिजन्स (एआय)च्या सहाय्याने हॅक केले जाऊ शकते.

निवडणूक आयोगाचे उत्तर -दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी मंगळवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राजीव कुमार यांनी EVM हॅक होण्यासंदर्भातील आरोपांना प्रत्युत्तर दिले. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्तांनी कुणाचेही नाव घेतले नाही. ते म्हणाले, एक तंत्रज्ञ आहेत, जे ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, ते जे बोतत आहेत, तसे अमेरिकेत तर होऊ शकते. तेथे वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान केले जाऊ शकते. तेथील मशीन्स इंटरनेटला कनेक्ट असतात. मात्र हे भारतात शक्य नाही."

"भारतामध्ये ईव्हीएमसोबत छेडछाड केली जाऊ शकत नाही. ईव्हीएममध्ये कुठल्याही प्रकारचे बग अथवा व्हायरस नाही. तसेच, हे हॅक केले जाऊ शकत नाही, हे निराधार आहे, असे सर्वोच्च न्यायालयानेही अनेक वेळा म्हटले आहे," असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाचे हे उत्तर इलॉन मस्क यांच्या 'त्या' विधानाशी जोडले जात आहे.

सायंकाळी 5 नंतर मतदानाची टक्केवारी कशी वाढते?पत्रकारांशी संवाद साधताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, आजकाल प्रत्येक निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मतदारांमध्ये मिस मॅच झाले, मतमोजणी मंदावली, ईव्हीएम हॅक केले...अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात. सायंकाळी 5 नंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचा आरोपही केला जातोय. पण, मतदानाची टक्केवारी कुठे वाढली, याची आम्हालाही माहिती द्या, आम्ही त्याची चौकशी करू. 

'या' सर्वांचा अभ्यास केल्यानंतर अंतिम आकडा जारी केला जातो -पोलिंग एजंट सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदान केंद्रातच असतात. ते मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतात. सर्व काही त्यांच्या समोर घडते. मतदान संपण्यापूर्वी, मतदान केंद्र सोडण्यापूर्वी फॉर्म 17 सी भरला जातो, ज्यामध्ये मतांची संख्या नोंदवली जाते. सेक्टर मॅजिस्ट्रेट दिवसभरात वेगवेगळ्या वेळी मतदान केंद्राला भेट देतात आणि मतदानाची नोंद घेतात ट्रेंड समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जगात कुठेही मतदान संपल्यानंतर 6 वाजता लगेचच मतदानाची टक्केवारी दिली जात नाही. 5 वाजल्यानंतर पीठासीन अधिकारी मतदारांना ठिकठिकाणी टोकन देतात. मग शेवटचे मतदान झाल्यानंतर ते पॅक केले जाते. फॉर्म 17 सी भरला जातो. त्याची संख्या लाखात आहे. या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर अंतिम आकडा जारी केला जातो, अशी महत्वाची माहिती राजीव कुमार यांनी यावेळी दिली.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगelon muskएलन रीव्ह मस्कEVM Machineईव्हीएम मशीन