शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सरन्यायाधीशांनी तेलुगू भाषेत संवाद साधला आणि पती-पत्नीमधील २१ वर्षे जुना वाद मिटला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 10:58 IST

Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयाने समजूत घातल्यानंतर पत्नीने पतीविरोधात हुंड्यासाठी छळ केल्या प्रकरणी पतीच्या कारावासात वाढ व्हावी, अशी मागणी करणारी याचिका मागे घेतली.

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयामध्ये बुधवारी एक वेगळ्याच प्रकारच्या खटल्याची सुनावणी झाले. यावेळी सरन्यायाधीशांनी घेतलेल्या पुढाकारामुळे गेल्या २१ वर्षांपासून कायदेशीर लढाईत अडकलेला पती-पत्नीमधील वाद मिटला. सर्वोच्च न्यायालयाने समजूत घातल्यानंतर पत्नीने पतीविरोधात हुंड्यासाठी छळ केल्या प्रकरणी पतीच्या कारावासात वाढ व्हावी, अशी मागणी करणारी याचिका मागे घेतली. (The Chief Justice communicated in Telugu and the 21-year-old dispute between the couple was settled)

हा खटला सरन्यायाधीश एन.व्ही रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आला होता. या पीठामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांचाही समावेश होता. व्हिडीओ कॉन्फ्रंसिंगद्वारे झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने पती-पत्नीमध्ये समेट घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. याचिकाकर्त्या महिलेला कोर्टाचे कामकाज सुरू असलेली इंग्रजी भाषा समजण्यात आणि बोलण्यात अडचण येत होती. त्यामुळे सरन्यायाधीशांनी कोर्टात तेलुगू भाषेत संवाद साधला. तसेच सहकारी न्यायाधीशांनाही आपण काय बोलतो आहोत, याचा अर्थ समजावून सांगितला. कोर्टाने सुनावणीदरम्यान महिलेला सांगितले की, जर तिचा पती तुरुंगात गेला तर तिला मिळणारी मासिक नुकसान भरपाई बंद होईल. कारण तुरुंगात गेल्यामुळे पती त्याची नोकरी गमावून बसेल.

गुंटूर जिल्ह्यातील एका सरकारी कर्मचारी असलेल्या पतीच्या वतीने हजर झालेले वकील डी. रामकृष्णन रेड्डी यांनी सांगितले की, सरन्यायाधीशांनी सदर महिलेला तेलुगू भाषेत कायदेशीर परिस्थितीबाबत माहिती दिली. तसेच कारावासाचा कालावधी वाढवल्याने कुणालाचा फायदा होणार नाही, असेही स्पष्टपणे सांगितले.

महिलेने सरन्यायाधीशांचे बोलणे धैर्यपूर्वक ऐकले आणि पतीसोबत राहण्यासाठी ती तयार झाली. सदर महिलेने सर्वोच्च न्यायालयासमोर अट ठेवताना सांगितले की, तिच्या पतीने तिचे आणि मुलाचे योग्य पद्धतीने पालनपोषण करावे. सर्वोच्च न्यायालयाने आता पती-पत्नीला ते एकत्र राहण्यास तयार आहेत, असे सांगणारे शपथपत्र दोन आठवड्यांमध्ये दाखल करण्यास सांगितले आहे. तसेत पत्नी आता पतीविरोधातील हुंड्यासाठी छळाची याचिका मागे घेईल. तसेच कोर्टात घटस्फोटासाठी दाखल केलेली याचिकाही मागे घेईल.

भारतामध्ये केवळ आंध्र प्रदेश राज्यामध्येच भादंवि कलम ४९८ अ अंतर्गत हुंड्यासाठी छळ हा तडजोड होऊ शकणारा गुन्हा आहे. अन्य राज्यांमध्ये दोन्ही पक्ष असे खटले परस्पर सहमतीने मिटवू शकत नाहीत.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयFamilyपरिवारIndiaभारत